HW News Marathi
महाराष्ट्र

श्रीकृष्णानंतर शिवाजी महाराज एकमेव दक्ष व्यक्तिमत्व – बाबासाहेब पुरंदरे

पुणे | पुण्यातील सारस अर्बन को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचा ५० वा वर्धापन दिन व देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात पुरंदरे यांचे शंभराव्या वर्षांत पदार्पण व महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब अनास्कर यांची नियुक्ती झाल्याच्या निमित्ताने अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते पुरंदरे व अनास्कर या दोहोंचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम स्वातंत्र्यदिनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के. बी. जोशी सभागृहात संपन्न झाला.

शिवचरित्र करमणूकीसाठी नाही तर शिकण्यासाठी आहे

या वेळी बोलताना पुरंदरे म्हणाले, “शिवचरित्र करमणूकीसाठी नाही तर शिकण्यासाठी आहे, याची जाणीव असायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांना अवघे ५० वर्षांचे आयुष्य लाभले, मला १०० वर्षांचे लाभले. पण माझ्या १०० वर्षांच्या आयुष्यात देखील मला महाराज पूर्ण समजले असा दावा मी करू शकत नाही.” शंभरीकडे वाटचाल करताना मी सध्या म्हातारपण आणि बाल्यावस्था कसे सारखेच असतात याचा अनुभव घेतो आहे असे सांगत आपण सारस अर्बन या पतसंस्थेसाठी सुमारे पाऊण कोटी रुपयांच्या ठेवी मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याचेही पुरंदरे यांनी नमूद केले.

भगवान श्रीकृष्णानंतर सदैव सावधान, दक्ष व सम्यक या गुणांचा अंगीकार असलेले नजीकच्या इतिहातील एकमेव व्यक्तीमत्त्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. महाराज हे सर्वांचेच असून सर्व भाषांमध्ये त्यांचे व्यक्तिमत्व समजावून सांगितले गेले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र भूषण व पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.प्रेरणादायी शिवचरित्र अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचावे यासाठीच बाबासाहेबांना परमेश्वराने १०० वर्षांचे आयुष्य दिले असे सांगून गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, विद्यार्थी दशेत असताना छत्रपती शिवाजी महाराज या थोर व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्याबरोबरच त्यांच्या मनात ते कायमस्वरूपी विराजमान होण्याचे संपूर्ण श्रेय हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनाच जाते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडीच्या आड केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे, वर्षा राऊतांच्या ईडी नोटीसवर पवारांची प्रतिक्रिया 

News Desk

“नितिनजी बेळगावात मराठी माणसाला पाडण्यासाठी भाजपकडून तुम्ही सभा घेणार?”

News Desk

चंद्रकांत पाटलांनी या प्रकरणात पडू नये, नाही तर उघडे पडाल!; राऊतांची धमकी

Aprna