HW News Marathi
Covid-19

‘श्रीमंत लोक आयसीयू बेड्स अडवतात’ राजेश टोपेंचा धक्कादायक खुलासा…

 

श्रीमंत लोक लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवतात – राजेश टोपे

मुंबई | राज्यात कोरोनारूग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाचं सध्या बेड्सची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स वेळेत मिळाल्याने अनेकांना राज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सगळ्या पार्श्वभूमिवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक अत्यंत महत्वाचे विधान केले आहे. ‘काही लोक करोनाची लक्षणं नसतानाही आयसीयू बेड्स अडवून ठेवत आहेत, अशी धक्कादायक माहिती देतानाच हा प्रकार थांबवावा लागेल. ज्यांना करोनाची लक्षणं आहेत, त्यांना बेड्स दिली पाहिजेत, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान राजेस टोपे यांनी श्रीमंत लोकांवर थेट आरोप करत म्हटलयं की , श्रीमंत लोकं ICU बेड वर जाऊन बसतात. याबाबत जागरूक राहीलं पाहिजे. ICU बेडवर लक्षणं नसलेल्यानं दिली नाही पाहिजे. लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवणाऱ्यांना थांबवावं लागेल, असंही ते म्हणाले.

पत्रकार पांडुरंग रायकर प्रकरणाची चौकशी होणार

पांडुरंग रायकर प्रकरणी चौकशी करणार यावेळी पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या निधनाबाबत बोलताना ते म्हणाले की, या घटनेत अॅब्युलन्स न मिळाले हे दुर्देवी आहे. याचं समर्थन नाही. अशा घटना घडू नये म्हणून आपण नियम बनवलेत. त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्हाधिकारी सगळ्यांना सांगितलं आहे की, ही सुविधा मोफत द्या. तरीही अशा घटना घडत आहेत जे दुर्देवी आहे. पांडुरंग रायकर प्रकरणी चौकशी करू तसेच माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊ, असंही टोपे म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुस्लीम समाजातील लोक कोरोना लस घेण्यास टाळाटाळ करतात, माजी मुख्यमंत्र्यांचं मत

News Desk

१५ मार्चपर्यंत भारतात कोरोना नाही असा मोदी सरकारचा दावा होता – जितेंद्र आव्हाड

News Desk

कोरोनाच्या लाटेवर आता शिवसेनेनं केला सवाल!

News Desk