HW News Marathi
महाराष्ट्र

हे तर दारूप्रेमी सरकार!  : सचिन सावंत

मुंबई महाराष्ट्रातील महामार्गालगतच्या १३ हजारांपेक्षा जास्त बिअर बार आणि परमिट रूमचे परवाने पुर्नस्थापित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे, हे सरकार दारूप्रेमी असल्याचे निदर्शक आहे, अशा तीव्र शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्य सरकारच्या निर्णयाची निंदा केली आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले की, माननीय सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या दारूच्या दुकानावरती बंदी आणली आहे. या अनुषंगाने महामार्गानजीकची सर्व बिअर बार, परमिट रूम आणि दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय झाला होता. दारूच्या नशेत वाहन चालवल्याने अपघात होऊन मृत्यूमुखी पडणा-यांची प्रचंड मोठी संख्या पाहता सदर निर्णय हा स्वागतार्हच होता. परंतु बार आणि परमिट चालवणा-या संघटनेच्या दबावाखाली राज्य शासनाने बार आणि परमिट रूमचे परवाने पुर्नस्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे प्रचंड खर्च करण्यात आला, त्यामागे सदर प्रकरणातील आर्थिक देवाणघेवाण कारणीभूत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दारूबंदीबाबत भाजपचे नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे वल्गना करत होते. परंतु लाखो लोकांच्या जीवापेक्षा या सरकारला दारू विक्रीतून मिळणारे उत्पन्न अधिक महत्त्वाचे वाटत आहे. याकरिता सरकारने शहरातून जाणा-या महामार्गांचा दर्जा काढून घेण्याचा घाटही घातला आहे. केरळ सरकारने देशाचे ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडून यासंदर्भात मागितलेल्या मताचा आधार घेऊन सदर परवाने पुर्नस्थापित केले जात आहेत. राज्य सरकार स्वतः देखील या संदर्भात ऍटर्नी जनरल यांचे मत मागवू शकले असते, पण यासाठी वाट पाहण्याची तसदीही सरकारने घेतली नाही. यावरून सरकारला हा निर्णय घेण्याची किती घाई आहे, हे स्पष्ट होते. महामार्गावर दारूच्या नशेत होणारे अपघात आणि त्यामुळे अनेक कुटुंबाची होणारी वाताहत पाहून सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतची दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामधून या निर्णयामागील उद्द्येशाचे महत्त्व अधोरेखीत होते. प्रत्येक समाजोपयोगी निर्णय न्यायालयाने घ्यावे आणि सरकारने मात्र त्यात पळवाट शोधावी,असे अतिशय दुर्देवी चित्र या सरकारने प्रस्थापित केले आहे. राज्य सरकारने पळवाट शोधून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामागील उद्द्येशाला हरताळ फासला आहे, असे म्हणून सचिन सावंत यांनी याविरोधात काँग्रेस पक्ष ठाम भूमिका घेईल असा इशारा सरकारला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“बैलगाडी शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीत बसून लवकरात लवकर मार्ग काढला जाईल” – जयंत पाटील

News Desk

लोकांचा जीव महत्त्वाचा, जमेल ती मदत करा, राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिकांना आवाहन

News Desk

पर्यावरणपूरक होळीच्या आयोजनातून आनंदाची धुळवड साजरी करूया! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Aprna
शिक्षण

बी.फार्म करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका तत्वावर मेडिकल दुकानात काम करता येणार

News Desk

मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांची घोषणा

मुंबई : मेडिकल स्टोर मध्ये फार्मासिस्ट मिळत नसल्यामुळे यापुढे बी. फार्म करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका या तत्वावर काम करण्याची परवानगी देण्यात येईल अशी महत्त्वाची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या प्रश्नावर आज विधानसभेत केली.

राज्यातील औषधांच्या दुकानांमध्ये फार्मासिस्ट ठेवणे बंधनकारक असून असे फार्मासिस्ट मिळत नाहीत, त्यामुळे औषध विक्रेता दुकानदाराची गैरसोय होतेच तसेच रुग्णांचे ही नुकसान होते. त्यामुळे याबाबत सरकारने योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली. दहिसर येथील साई शिवाई फार्म मधून बनावट इनहेलर चा साठा जप्त करण्यात आला होता याबाबतचा तारांकित प्रश्न आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. यावेळी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी रुग्णांची आणि औषध विक्रेत्यांची होणारी गैरसोय याकडे सरकारचे लक्ष वेधले त्यावर उत्तर देताना मंत्री गिरीश बापट म्हणाले की, मेडिकल स्टोर मध्ये फार्मासिस्ट असणे बंधनकारक आहे. मात्र तेवढे फार्मासिस्ट उपलब्ध होत नाहीत, त्यासाठी बी.फार्म शिकणारी मुल ही शिकत असताना कमवा आणि शिका या तत्वावर मेडिकल स्टोर वर काम करू शकतील अशी परवानगी सरकार कडून देण्यात येईल जेणेकरून रुग्णांची गैरसोय होणार नाही आणि तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.

Related posts

१० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्रालयाचा अजब आदेश

News Desk

तुमच्या पगारापेक्षा बाराशेपट अधिक पगार घेतात सीईओ

News Desk

स्कूलबस चालकाचा मुलगा सीएसच्या परीक्षेत अव्वल

News Desk