HW News Marathi
महाराष्ट्र

रायगड जिल्ह्याला १०० कोटींची तातडीची मदत मुख्यमंत्र्यांकडून जाहीर

रायगड | ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात नुकसान झाले. रायगड जिल्ह्यातीलही काही भागात नुकसान झाले आहे. याच नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (५ जून) पाहणी केली. नुकसाग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर तात्काळ रायगड जिल्ह्याला १०० कोटी रुपयांची मदत जाहीर त्यांनी केली आहे. पंचनामे होतील पण सध्या तातडीची मदत म्हणून ही रक्कम देण्यात येत आहे. इतर जिल्ह्यांनाही मदत केली जाईल, असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या परिषदेत म्हटले आहे.

आपण पॅकेज जाहीर करणार नसून सध्या १०० कोटींची मदत जाहीर करत आहोत. ताबडतोब जे काही करता येईल त्याला सुरुवात केली आहे. नुकसानीकडे पाहत असताना पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने आदेशाची वाट न पाहता कामाला सुरुवात केली आहे. पंचनामे पूर्ण होण्यास ८ ते १० दिवस लागतील. त्यानंतर पुढील मदत जाहीर करण्यात येईल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. केंद्राकडे मदत मागण्यासंबंधी विचारणा केली असता उद्धव ठाकरेंनी नुकसान झाल्यानंतर लगेच मागावे असे होऊ नये. आपण व्यवस्थित आढावा घेऊन मदत मागू असे म्हटले.

आज जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशीच रायगडमद्ये यावं लागलं. निसर्गाचं रौद्ररुप आपण पाहिलं पण रायगडने ते अनुभवलं. ती दृष्य अत्यंत भीतीदायक होती. रायगडमध्ये लोकांना दिलासा देण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी आलो आहे. जीवितहानी होऊ न देणं प्रशासनाचं काम असतं. पण सहा जण मृत्यूमुखी पडले हे दुर्दैव आहे. पैसे देता येतात पण घरातली गेलेली व्यक्ती परत येत नाही, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

“रायगड आणि वादळ हे काही नवीन नाही. शिवरायांच्या रायगडला वादळ पचवणं काही नवीन नाही,” असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. “पण हे वादळ बऱ्याच वर्षांनी आलं. ताकदीने रायगडावर धडकलं. वादळाचा धोका टळला असला तरी कोरोनाचं संकट कामय आहे. घरं उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांची राज्य सरकार सोय करणार असून लवकरात लवकर स्वच्छता करणं गरजेचं असल्याचं,” उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वेळ पडली तर सरकार पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी कर्जही काढेल !

News Desk

वृक्ष लागवड योजनेच्या यशासाठी १८ महिन्यांची रोपं द्या – सरपंच संघटनेची मागणी   

News Desk

‘शिवसेना आमदार प्रताप सरनाईक इतके हतबल का झाले?’, राऊतांनी सांगितले कारण

News Desk