HW News Marathi
महाराष्ट्र

उत्तर प्रदेशात स्कूल व्हॅनला ट्रेनच्या धडकेत १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

लखनऊ | उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल व्हॅनला झालेल्या भीषण आपघातात ट्रेनने धडक दिल्यामुळे चालकासह १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर ८ विद्यार्थी जखमी झाले आहेत. सदर व्हॅन रेल्वे फाटक क्रॉस करत असताना ट्रॅकवरून भरधाव वेगात येत असलेल्या पँसेंजरची धडक बसून हा अपघात झाला.

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. डिव्हाइन पब्लिक स्कूलची टाटा मॅजिक गाडी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत निघाली होती. या धडकेने व्हॅनचा चेंदामेंदा झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईत ओमायक्रॉनचे ३ रुग्ण, तर शहराच्या हद्दीत कलम १४४ लागू

News Desk

सगळ्यांनी वेगवेगळे लढून पाहू, पण २ दिवस आधी सेटलमेंट करायची नाही, चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना आवाहन

News Desk

सरसकट शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले उत्तर…

News Desk
महाराष्ट्र

एकनाथ खडसे आणि नारायण राणे यांची केंद्रात वर्णी

News Desk

नवी दिल्ली | नारायण राणे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष्याची स्थापना केली. त्यानंतर ते एनडीएत सामील झाले. राणे हे गेल्या अनेक दिवसापासून राज्याच्या राजकारणात सक्रीय होण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत. यासाठी राणेंनी दिल्लीत जावून भाजपचे अध्यक्ष आमित शहा यांची भेट देखील घेतली. या भेटीनंतर राणेंना केंद्रात पाठविण्यात येणार असल्याचे चर्चाला उधान आले आहे.

तसेच गैरव्यवहाराच्या आरोपामुळे एकनाथ खडसे यांना महसूलमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर खडसे सुद्धा राजकारणापासून काही काळ लांब राहिले होते. पण, पक्ष्याकडून त्यांना केंद्रात पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

येत्या २३ मार्चला राज्यसभेच्या ५८ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात राज्यसभेसाठी ६ जागावर निवडणुका होणार आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातून भाजपचे ३ उमेदवार राज्यसभेत पाठवण्यात येणार आहे. भाजपच्या वतीने दोन जांगेवर नारायण राणे आणि एकनाथ खडसे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाला असल्याचे कळत आहे. आता एका जाग्यांवर भाजपमधील कोणत्या नेत्याची वर्णी लागणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Related posts

‘त्या’ शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला विकत घेऊन धनंजय मुंडेंनी दिला दिलासा

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम दोन वर्षात पूर्ण करणे शक्य !

swarit

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात तोडफोड

News Desk