HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राठोडांना विरोध केला तर परिणाम भोगा, पोहरादेवीच्या महंतांचा भाजपला सज्जड इशारा!

औरंगाबाद। माजी वनमंत्री संजय राठोड हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी सध्या संभाजीनगरचा दौरा करत आहे. माझ्या समाजातील आणि भटक्या समाजातील बांधवाना भेटत आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रश्न आहे. संजय राठोड हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मी सध्या संभाजीनगरचा दौरा करत आहे. माझ्या समाजातील आणि भटक्या समाजातील बांधवाना भेटत आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रश्न आहे. माझ्या मंत्रीपदाबाबद्दल मला काही बोलायचं नाही. याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील. मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही, असं राठोड यांनी सांगितलं

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्राचे माजी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उदय सामंतांनी संजय राठोड हे आपल्या एंट्रीचे मंत्रीमंडळात येण्याचे संकेत देतात, त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आणि चित्रा वाघ पुन्हा आक्रमक झाले आहेत, संजय राठोडांना मंत्रीमंडळात स्थान दिलं तर राज्यभरात आंदोलनं करु असा इशारा दिला होता.

त्यानंतर पोहरादेवी संस्थानाचे मंहत सुनील महाराज यांनी आता भाजपला इशारा दिला आहे. “माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील कोणतेच आरोप सिद्ध झाले नाहीत. तर तीन महिने उलटून गेले तरीही राठोड यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल नाही. मग तरीही चंद्रकांतदादा पाटील कोणाविरुद्ध आंदोलन करणार आहेत? त्यांचं आंदोलन बंजारा समाजाविरुद्ध आहे का? असं असेल येणाऱ्या काळात बंजारा समाजच भारतीय जनता पार्टीला उत्तर देईल, याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील.” अस पोहरादेवी संस्थानचे महंत सुनील महाराज यांनी सांगितलं आहे.

पोहरादेवी संस्थान हे बंजारा समाजाचं आराध्य दैवत मानलं जातं. आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर त्यांनी कोरोनाकाळात पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन केलं होतं. ज्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायला लागला होता. त्यावेळीही पोहरादेवीच्या महंतांनी राठोड यांना राजीनामा न देण्याची विनंती केली होती. त्यातच उदय सामंत यांच्यासारख्या शिवसेना नेत्याने संजय राठोड यांच्या पुनरागमनाचे संकेत दिल्यामुळे आता नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

काय म्हणाले होते उदय सामंत?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान शिवसेना आमदार संजय राठोड हे पुन्हा मंत्रिमंडळात सामील होण्याचे संकेत मिळताहेत. कालच( 11जुलै) ला शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यांचे संकेत दिलेत. उदय सामंत म्हणाले की, संजय राठोड यांच्या कामाची पद्धत पाहता त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, लवकरच ते मंत्रिमंडळात सामील होतील. उदय सामंताच्या वक्तव्यावर स्वतः संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राठोड काय म्हणाले?

माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, असं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं. सध्या संजय राठोड हे औरंगाबादच्या दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. मी सध्या संभाजीनगरचा दौरा करत आहे. माझ्या समाजातील आणि भटक्या समाजातील बांधवाना भेटत आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रश्न आहे. माझ्या मंत्रीपदाबद्दल मला काही बोलायचं नाही. मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही, याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असं राठोड यांनी स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आता मी भाजपला ताकद दाखवतो”, खडसेंची भाजपविरुद्ध गर्जना

News Desk

“मराठा समाजाला आरक्षण द्या नाहीतर…”,चंद्रकांत पाटील यांचा सरकारला गंभीर इशारा  

News Desk

‘टीआरपी’ घोटाळ्याची चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते  – जयंत पाटील

News Desk