HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील १५१ तालुक्यांसह आणखी २५० मंडळांचा दुष्काळ यादीत समावेश

मुंबई | काल (बुधवार) अखेर राज्य सरकारने महाराष्ट्रातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे ११२ तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचेही म्हटले आहे. आज (गुरुवार) आणखी २५० मंडळांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्याचा अहवालही केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. ज्या महसूल मंडळात ७५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ७०० मीमीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे, अशा २५० मंडळांना दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे दुष्काळासंदर्भातील काही तक्रारी किंवा तांत्रिक अडचणी असतील तर त्याबाबत आलेली निवेदने तपासून त्यानंतर त्यांनाही दुष्काळ जाहीर करण्यात येईल, अशीही माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांकडून सातत्याने वारंवार जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या राजमुद्रा असलेल्या नव्या भगव्या झेंड्याचे अनावरण

swarit

‘स्थानिक स्व.संस्थांच्या निवडणुकीत आघाडी होणार की नाही’, अजित पवार म्हणाले…

News Desk

‘जनाब सेना’ म्हणून हिवणाऱ्यांनी त्यांचा भूतकाळ तपासून पाहावा; राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Aprna
राजकारण

महाआघाडीमध्ये आता चंद्रबाबू नायडू यांचा समावेश

Gauri Tilekar

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री तेलुगू देसम पार्टी(टीडीपी)चे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांची भेट घेतली. अखेर काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्ष या दोन्ही पक्षांकडून एकत्र येण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे या पक्षांनी म्हटले आहे. प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत झालेल्या भेटीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

आगामी निवडणुकांमध्ये भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेसकडून महाआघाडीसाठी प्रयत्न सुरु आहेत. आता या महाआघाडीमध्ये तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडूचंद्रबाबू नायडू यांचा समावेश झाला आहे.

राहुल गांधी आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू एनडीएमधून बाहेर पडले होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या दोघांमधील भेट झाली असल्याचे अंदाज व्यक्त केला जात होताच. त्याचप्रमाणे या दोन्ही पक्षांनी आता ते एकत्र येत असल्याची घोषणा केली आहे.

Related posts

“लवकरच मुंबई पालिकेसह विधानसभा निवडणुका घ्याव्यात” – उद्धव ठाकरे

Manasi Devkar

सत्ताधार्‍यांना हिंदुत्व आणि राममंदिरही नको झाले !

News Desk

काँग्रेसच्या जाहीरनाम्यासाठी रघुराम राजन करणार मदत ?

News Desk