HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील १५१ तालुक्यांसह आणखी २५० मंडळांचा दुष्काळ यादीत समावेश

मुंबई | काल (बुधवार) अखेर राज्य सरकारने महाराष्ट्रातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे ११२ तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचेही म्हटले आहे. आज (गुरुवार) आणखी २५० मंडळांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्याचा अहवालही केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. ज्या महसूल मंडळात ७५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ७०० मीमीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे, अशा २५० मंडळांना दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे दुष्काळासंदर्भातील काही तक्रारी किंवा तांत्रिक अडचणी असतील तर त्याबाबत आलेली निवेदने तपासून त्यानंतर त्यांनाही दुष्काळ जाहीर करण्यात येईल, अशीही माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांकडून सातत्याने वारंवार जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘त्या’ पुस्तकात महाराजांचा किंचितही अपमान झालेला नाही !

News Desk

भारतीय क्रिकेट टीमचे विमान मुंबईत लॅंड करण्यामागे शरद पवार!

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: ड्रायव्हिंग करत पोहचले रिलायन्स रुग्णालयात

News Desk