HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील १५१ तालुक्यांसह आणखी २५० मंडळांचा दुष्काळ यादीत समावेश

मुंबई | काल (बुधवार) अखेर राज्य सरकारने महाराष्ट्रातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे ११२ तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचेही म्हटले आहे. आज (गुरुवार) आणखी २५० मंडळांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्याचा अहवालही केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. ज्या महसूल मंडळात ७५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ७०० मीमीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे, अशा २५० मंडळांना दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे दुष्काळासंदर्भातील काही तक्रारी किंवा तांत्रिक अडचणी असतील तर त्याबाबत आलेली निवेदने तपासून त्यानंतर त्यांनाही दुष्काळ जाहीर करण्यात येईल, अशीही माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांकडून सातत्याने वारंवार जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हिंगणघाट जळीतकांड म्हणजे महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना

swarit

भीमा-कोरेगाव प्रकरणी यशस्वीरित्या तपास करू | आयुक्त

swarit

चंद्रकांत दादा गोड माणूस आहेत!,संजय राऊतांची वाढदिवसानिमित्त पाटलांना कॉंम्प्लिमेंट

News Desk
देश / विदेश

उत्तर प्रदेशातील भीषण रेल्वे अपघातात 23 ठार

News Desk

मुजफ्फरनगर :उत्तरेत झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने देशभरात थरकाप उडाला आहे. पुरी-हरिद्वार उत्कल एक्सप्रेस चे 14 डब्बे रुळावरून घसरून शनिवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला. यात 40 जण जखमी झाले आहेत. मुजफ्फर नगर जिल्ह्यात खतौली येथे झालेल्या या अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.

सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना तत्काळ मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या. सुरेश प्रभू यांनी टिष्ट्वट करून, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती दिली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना मदत आणि बचावकार्याची देखरेख करण्यास सांगितले आहे. एनडीआरएफच्या तुकड्या गाझियाबादमधून मदतीसाठी रवाना झाल्या आहेत. मेडिकल व्हॅनही येथे पोहोचल्या आहेत.

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Related posts

तुम्ही तुमचा जादुई व्यायामाचा दिनक्रम कायम ठेवा, कदाचित अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल !

swarit

#ElectionCommission : जाणून घ्या… पाच राज्याच्या मतदानाचे संपूर्ण वेळापत्रक

Aprna

दुचकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी केले गुजरातच्या बसवर हल्ला

News Desk