HW News Marathi
महाराष्ट्र

गडचिरोली | पोलिसांच्या कारवाईत १६ नक्षलवादी ठार

गडचिरोली | जिल्ह्यातील भामरागड-एटापल्ली तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील तब्बल १६ नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. या कारवाईत नक्षवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य व जहाल कमांडर साईनाथ ऊर्फ डोलेश मडी आत्राम (३५) व श्रीणू ऊर्फ श्रीकांत ऊर्फ रोवूथ विजेंद्र नरसिंहा रामडू (३८) या दोघांना मारण्यात पोलिसाना आले.

या पोलीस कारवाईत पेरीमिली दलमचे बहुतांश सदस्य ठार झाले आहेत. गडचिरोली पोलिसांच्या सी-६० पथकाने शनिवारी रात्रीपासून शोधमोहीम सुरू केली होती. रविवारी नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी चारही बाजूने घेराव करुन १६ नक्षलवाद्यांना ठार केले. यात दोन महिला नक्षलवाद्यांचा ही समावेश असून त्यांना ठार करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्णब गोस्वामींसाठी भाजप नेते राम कदम यांचे सरकारविरोधात मंत्रालयाबाहेर लाक्षणिक उपोषण

News Desk

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

News Desk

“नारायण राणे कुठेही गेले तरी, लोकं तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार”

News Desk