HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात !

मुंबई | मुंबईत आणि संपूर्ण राज्यभरात गेले काही दिवस पाऊस पडत आहे. मात्र, मुंबई महापालिका क्षेत्रात येत्या ५ ऑगस्टपासून पाणी कपात करण्यात येणार आहे. यानुसार मुंबईत २० टक्के पाणी कपात केली जाणार आहे. कमी पावसामुळे पाणीकपातीचा हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

या वर्षी पावसाळ्यात जून आणि जुलै या २ महिन्‍यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात फक्त ३४ टक्के पाण्याचा साठा उपलब्ध आहे.

हीच परिस्थिती यापुढेही राहिल्‍यास पावसाळा संपल्‍यानंतरही पालिकेकडे पुरेसा जलसाठा उपलब्‍ध होऊ शकणार नाही. मुंबईचा पाणीपुरवठा ३१ जुलै २०२१ पर्यंत सुरळीपणे चालू ठेवण्‍यासाठी पाणी पुरवठ्यात ५ ऑगस्टपर्यंत २० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्‍या जल अभियंता खात्‍याद्वारे देण्‍यात आली आहे.

दरम्यान, ही पाणीकपात मुंबई महापालिकेतर्फे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांनासुद्धा लागू राहणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या कालावधीत पाण्‍याचा योग्य पद्धतीने वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दर्जेदार रस्ते व पुलांमुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार! – नितीन गडकरी

Aprna

“सत्ता गेल्यावर सगळेच जमिनीवर येतात”, सत्यजित तांबेंचा फडणवीसांवर निशाणा

News Desk

कागदी घोडे नाचऊ नका ! -खा.अशोक चव्हाण 

News Desk