HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या !

बई | कोरोना संकटात राज्ययातीलत आणखी पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात शिर्डी येथील साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून के.एच. बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये मुंबई म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात शिर्डी येथील साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून के.एच. बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्य सरकारनं पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

यात मुंबई म्हाडाच्या उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची वन विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव संजय खंदारे यांची महाजेनकोच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मुख्य सचिवांच्या कार्यालयात उप सचिवपदी बदली करण्यात आली आहे. जलस्वराज्य प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक ए.ए.गुल्हाणे यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. शिर्डी येथील साई संस्थानच्या सीईओपदी सरकारकडून के.एच. बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रतन टाटा यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

Aprna

राज्यपालांना भाजपच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडले जात आहे – सामना

News Desk

गेंड्याची कातडी असलेल्या सरकारला चाबकाचाही फरक पडणार नाही | धनंजय मुंडे

News Desk