HW News Marathi
महाराष्ट्र

रुग्णांच्या सेवेत भर घालण्यासाठी औरंगाबादमध्ये करणार ५० डॉक्टरांची भरती

औरंगाबाद | महाराष्ट्रात सद्यस्थितीला कोरोनाबाधितांची संख्या १६० वर पोहोचली आहे. मुंबई, पुण्यानंतर आता नागपूर, सांगली, कोल्हापूर आणि औरंगाबादमध्येही मोठ्या कोरोनाचा धोका वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. रुग्णांच्या सेवेत कोणतीही कमतरता होऊ नये यासाठी औरंगाबादेत ५० डॉक्टर्ससह ५२७ पदांची मेगाभरती करण्यात येणार आहे. यातून आरोग्य विभागातील मनुष्यबळ वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दरम्यान, औरंगाबाद आरोग्य विभागाने या मेगाभरतीसाठी निवृत्त डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पाचारण केले आहे. या निमित्ताने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी होणार आहे. या सर्व निवृत्त डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती कंत्राटी पध्दतीने केली जात आहे. कोरोना व्हायरस साथीला प्रतिबंध करण्यासाठी औरंगाबादमध्येही मोहिम सुरु करण्याची शक्यता आहे. तसेच, विलगीकरणासाठीही अनेक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पूजा चव्हाणच्या मृत्यूवरुन विरोधकांनी घाणेरडं राजकारण केलं – संजय राठोड

News Desk

ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातंय! देवेंद्र फडणवीसांचा रोख कोणावर?

News Desk

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नाही? नवाब मलिकांचा गौप्यस्फोट!

News Desk