HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्र सरकारकडून ‘या’ तीन चिनी कंपन्यांसोबत झालेल्या ५ हजार कोटींच्या करारांना स्थगिती

मुंबई | लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर चीनला आर्थिक धडा शिकविण्यासाठी भारताने चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मोहिम सुरू केली आहे. या आंतर्गत महाराष्ट्र सरकारने चिनी कंपन्यांबरोबर केलेल्या तीन मोठ्या करारांना स्थगिती दिली आहे. उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र २.० (दोन) या कार्यक्रमा अंतर्गत चिनी कंपन्यांशी करण्यात आलेल्या पाच हजार कोटींच्या प्रकल्पांना आता स्थगिती देण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना म्हटले आहे.

सुभाष देसाई म्हणाले, “केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या करारांवर आधीच भारतीय सीमेवर चीनने २० जवान शहीद होण्याआधीच स्वाक्षरी झाल्या होत्या, असे स्पष्टीकरण दिले. तर परराष्ट्र मंत्रालयाने या पुढे चिनी कंपन्यांशी कोणताही करार करु नये, असा सल्ला दिला आहे,” असा सल्ला ही त्यांनी ‘द टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना म्हणाले आहे. उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र २.० (भाग दोन)चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थिती १५ जून रोज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीला चीनचे भारतीय दूत सन विडोंग सुद्धा उपस्थित हे करार करण्यात आला होता. मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० च्या माध्यमातून सरकारने १२ करार करण्यात आले. त्यामध्ये सिंगापूर, दक्षिण कोरिया, अमेरिकन कंपन्यांबरोबरच भारतीय कंपन्यांबरोबरही करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

‘या’ तीन चिनी कंपन्यांसोबमधील करारावर स्थगिती

मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 (भाग दोन) अंतर्गत ग्रेट वॉल मोटर्स (जीएमडब्ल्यू) या वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपनीबरोबर ३ हजार ७७० कोटींचा करार झाला. या कराराअंतर्गत जीएमडब्ल्यू पुण्यातील तळेगावमध्ये वाहननिर्मिती कारखाना उभारणार होती. महाराष्ट्र सरकार आणि चिनी कंपन्यांमध्ये झालेल्या महत्वाच्या करारांपैकी हा सर्वात मोठा करार मानला जात होता. याबरोबर पीएमआय इलेक्ट्रो मोबॅलिटी या कंपनीने फोटॉन या दुसऱ्या चिनी कंपनीसोबत एक हजार कोटींचा कारखाना सुरु करण्याचा करार केल्याचे राज्य सरकारने म्हटले होते. या करारातून राज्यात करारामधून दीड हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार होते. तसेच राज्य सरकारने हेन्गेली इंजिनियरिंगनीबरोबर तिसरा २५० कोटींची गुंतवणूक करण्यासंदर्भात करार केला होता. या करारामधून १५० जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण दोषी 

News Desk

सोनियांचं पत्र म्हणजे दबावतंत्र नाही | संजय राऊत

News Desk

ममता बॅनर्जी ५ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार!

News Desk