HW News Marathi
महाराष्ट्र

घरी जाण्यासाठी पायी प्रवास करणे जीवावर बेतले, ७ प्रवाशांचा अपघात

विरार | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. सर्वच प्रवासी साधने बंद असल्याने लोकांनी पायी घरी जाण्यास सुरवात केली आहे. अशाच पायी घरी जाणाऱ्या ७ प्रवाशांचा मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत भीषण अपघात झाला आहे. यात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी आहेत, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व प्रवासी सध्या देशात संचार बंदी सुरू असल्याने आपल्या घरी गुजरातच्या दिशेने जात होते.

दरम्यान, गुजरात येथील हद्द बंद असल्याने त्यांना परत पाठवण्यात आले होते. परत वसईच्या दिशेने येत असताना महामार्गावरील विरार हद्दीत भारोल परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या आयसार टेम्पोने या प्रवाश्यांना जोरदार धडक दिली. या अपघातातील २ जणांची ओळख पटली असून ५ जणांची मात्र ओळख पटली नाही. ओळख पेटलेल्या पैकी कल्पेश जोशी (३२) तर दुसरा मयांक भट (३४) अशी आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘२०२४ च्या निवडणुकीत जुन्नर तालुक्याचा आमदार हा भाजपाचा असेल आणि तो…’, फडणवीसांचा ईशारा!

News Desk

केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना कश्यप प्रकरणात लक्ष देण्यास सांगेल, आठवलेंचा पायल घोषला शब्द

News Desk

विमानात महिलेसोबत अश्लिल कृत्य – आरोपी अटक

News Desk