HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, आदित्य ठाकरेंच्या खात्याचे नाव बदलले

मुंबई | महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज (९ जून) पार पडली आहे. या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पर्यावरण विभागाचे नाव बदलून आता ‘पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग’ असे करण्याचा महत्वापूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. सध्याची परिस्थिती, पर्यावरणात होत असलेले बदल आणि त्याचा सामान्यांवर होत असलेला परिणाम या सगळ्यांची दखल घेत हा विभागाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

पर्यावरण हा आदित्य ठाकरे यांच्या आवडीचा विषय आहे. पर्यावरण विभागाचे नाव हा बदलही त्यांच्याच सूचनेनुसार झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्य प्लॅस्टिक मुक्त करणे असो किंवा समुद्र किनारे स्वच्छ करण्याचा विषय आदित्य ठाकरे यांनी या सर्व विषयांमध्ये मंत्रिमंडळात येण्याआधीपासूनच सक्रिय सहभाग घेतला होता.

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात निर्णय

  • शासकीय कला महाविद्यालयांमधील 159 अध्यापकांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता
  • मराठवाड्यातील 5 कौटुंबिक न्यायालयांना पुढील 5 वर्षांसाठी मंजुरी
  • वेंगुर्ला येथील मौजे शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्यास ताज ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स कंपनी याना 54.40 हे.आर. जमीन भाडेपट्ट्यावर
  • पर्यावरण विभागाचे नाव बदलून ” पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग” असे करण्याचा निर्णय
  • ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय कंपन्यांच्या कर्जाला शासन हमी
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी आता १५ मार्चपासून होणार

News Desk

कायदा सुव्यवस्थेचे पालन करत जनतेला सुविधा उपलब्ध करून द्याव्यात !

News Desk

महिलांना स्व-संरक्षणाचे धडे

News Desk