HW News Marathi
महाराष्ट्र

जयश्री पाटलांचा ईडीने नोंदवला ४ तास जबाब ! अनिल देशमुखांविरोधात पुरावे दिले ?

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अनिल देशमुख प्रकरणी ईडीने आज (१९ मे) अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा ईडीने जबाब नोंदवला आहे. जवळपास ४ तास जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी त्यांनी ईडीला अनेक पुरावे दिले आहेत. तसेच ईडीच्या सर्व प्रश्नांचीही उत्तरे दिल्याचा दावा जयश्री पाटील यांनी केला आहे. त्यामुळे पाटील यांनी ईडीला नेमके कोणते पुरावे दिले? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. या प्रकरणी जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेत सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

याप्रकरणी आज ईडीने जयश्री पाटील यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार पाटील या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात आल्या होत्या. यावेळी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. मला ईडीने प्रश्न उत्तर स्वरुपात माहिती विचारली. ईडीच्या सर्व प्रश्नांना मी उत्तरे दिली आहेत. त्यांना अनेक पुरावे दिले आहेत. ज्या लोकांकडून पैसे गोळा केले जात होते, त्यांची माहिती दिली आहे, असं पाटील म्हणाल्या आहेत. आज चार तास माझा जबाब नोंदवण्यात आला. परंतु, माझा जबाब आज पूर्ण झालेला नाही. मला पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं जाणार आहे. जेव्हा बोलावलं जाईल, तेव्हा मी पुन्हा ईडीच्या कार्यालयात जाऊन ईडीला सहकार्य करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दर महिना १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे पत्र २० मार्च २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. त्या पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत ही समिती चौकशी करणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘नागपूर पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?’ नितीन राऊत म्हणाले…..

Jui Jadhav

‘हॅास्पिटलमधूनही पवारांची राज्य आणि देशावर बारीक नजर’ संजय राऊतांनी घेतली पवारांची भेट

News Desk

अमित राज ठाकरे तातडीने नाशकात, राज ठाकरे मोठी जबाबदारी देणार?

News Desk