HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्रानंतर ठाकरे सरकारने इंधन दरात सवलत द्यायलाच हवी, चंद्रकांत पाटलांची मागणी

मुंबई। मोदी सरकारने पेट्रोलच्या दरात पाच रुपये आणि डिझेलच्या दरात दहा रुपये सवलत दिल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारनेही व्हॅटमध्ये कपात करून राज्यात अधिकची सवलत दिलीच पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. आसाम आणि गोवा या छोट्या राज्यांना पेट्रोल, डिझेलमध्ये सवलत देणे परवडते तर महाराष्ट्रासारख्या सर्वात श्रीमंत राज्यालाही सवलत देणे परवडले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारनेही पेट्रोल डिझेलवरील करात कपात करून दिलासा द्यावा, अशी जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे. पण सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी कांगावा करून सर्व सवलत केंद्रानेच द्यावी असे सांगितले आहे. हा धक्कादायक प्रकार आहे. सर्व जबाबदारी केंद्रानेच पार पाडावी आणि राज्याने केवळ कर वसुली करावी, हे चालणार नाही, असेही पाटील म्हणाले.

भाजपची पिछेहाट झाल्याचा दावा करणाऱ्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलने केली. पण आता केंद्राने सवलत दिल्यानंतर राज्यात व्हॅटमध्ये कपात करून पेट्रोल डिझेलचा दर आणखी कमी करण्यात सत्ताधारी आघाडीकडून टाळाटाळ सुरू झाल्याने या तीनही पक्षांचा ढोंगीपणा उघड झाला आहे. या पक्षांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणे घेणे नसून केवळ केंद्र सरकारवर सातत्याने जबाबदारी ढकलायची आहे हे स्पष्ट झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.देशात नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या जागा सहावरून वाढून सात झाल्या. याखेरीज भाजपच्या मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आले. दुसरीकडे या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांची संख्या दहावरून आठ झाली. तरीही भाजपची पिछेहाट झाल्याचा दावा करणाऱ्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी, असा टोलाही पाटील लागवला.विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची पिछेहाट झाल्याने पेट्रोल डिझेलच्या दरात केंद्राने सवलत दिल्याचा भाजपविरोधी पक्षांचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

हात जोडून विनंती, हे सगळं थांबवा

एखाद्या अधिकाऱ्यावर संशय असेल तर चौकशी करा कारवाई करा, शिक्षा करा पण एखाद्या अधिकाऱ्याच्या मागे एवढे लागणे कारण त्याने आपल्या जावयाला अटक केली म्हणून हे न कळणारे आहे. एकंदरीत समीर वानखेडे प्रकऱण वरवर दिसतं आहे तेवढ सोप नाही. यासाठी २० ते २५ वर्षांपुर्वीची माहिती काढली पाहिजे. केव्हाचे तरी हिशोब चुकतं करणं चाललय का हे न कळणारे आहे. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे. यंत्रणांना आपले काम करु द्या असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मॉडेल कायदा व सध्याचा कायदा कळून न कळल्याचे दाखवत लोकांना मुर्ख बनवण्याचे काम मोदी करत आहेत – नवाब मलिक

News Desk

खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते खासदार उदयनराजे भोसलेंचं अजब विधान!

News Desk

पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी खारघरमधील खड्डे प्रशासनाने भरले

News Desk