HW News Marathi
देश / विदेश

प्रताप सरनाईकांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीची बैठक, एकनाथ शिंदेंनी बैठकीनंतर दिली ‘ही’ माहिती

मुंबई। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राने राज्याचे राजकारण ढवळून निघालं होतं.प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला कमकुवत करत असल्याचा आरोप केला होता. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी समन्वय समितीत झालेल्या चर्चेची देखील माहिती दिलीये.

तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कोणतेही वाद नाहीत. कोणताही असमन्वय नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेबद्दल विचारले असता एकनाथ शिंदे यांनी स्वबळाचा नारा दिला यात गैर काय? प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं. तिन्ही पक्षांमध्ये कोणीही नाराजी नाही, महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असंही शिंदे म्हणाले. आजच्या समन्वय समितीच्या बैठकीत महामंडळं आणि इतर विषयांवर चर्चा झाली. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती देखील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलीये.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय सहन करणाऱ्या लोकांना न्याय मिळेल !

News Desk

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तिवारी यांचे निधन

News Desk

तेलंगणा विधानसभेच्या मतदानाला सुरुवात

News Desk