HW News Marathi
महाराष्ट्र

गर्दीत कोरोना चेंगरून मेला की काय असे मला वाटले!

पुणे | कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. त्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जगभरात कोरोना बाधित रुग्ण अद्याप ही आढळत आहे. त्यामुळे दुसरी लाट आपल्या इथे येईल असे बोलले जात आहे.

आता दिवाळी सणानिमित्त रस्त्यावर झालेली गर्दी आणि त्यानंतर आता पुढील आठ ते दहा दिवसातील रुग्ण संख्येचा विचार करून, पुढील निर्णय घेतला जाणार आहे. पण एवढ्यात लॉक डाऊन होईल, असे बोललो तर नागरिक पॅनिक होतील. अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्तिकी एकादशी बाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, पूजा कोण करणार हा राज्य सरकारचा निर्णय असतो. मात्र परंपरेनुसार आषाढीला मुख्यमंत्री आणि कार्तिकीला उपमुख्यमंत्री किंवा सिनियर मंत्री पुजा करतात. त्यानुसार राज्य सरकार निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

कोरोना आजाराचा फटका सर्व क्षेत्राला बसला असून पूर्वीसारखी परिस्थिती होण्याच्या दृष्टीने सरकार काम करीत आहे. मात्र त्याच दरम्यान दिवाळी सणानिमित्त रस्त्यावर प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली. आपल्या पुण्यातील बाजीराव रोडवर एवढी गर्दी झाली की, गर्दीत कोरोना चेंगरून मेला की काय असे मला वाटले, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात मेळाव्यात करताच सभागृहात एकच हंशा पिकला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तेजस ठाकरे राजकारणात येणार ? वरूण सरदेसाई म्हणतात…

News Desk

स्थानिक उद्योगांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यात येईल! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का?

News Desk