HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपाल आमच्यावर न्यायालयात जाण्याची वेळ येऊ देणार नाहीत, अजित पवारांचे सूचक वक्तव्य

नाशिक | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते नाशिक येथे बोलत होते. बहुमत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सर्व निकष पाळत योग्य त्या नावांची शिफारस केली आहे. राज्यपालांना रीतसर सगळं कळवलेलं आहे, असं अजित पवार म्हणाले. त्यांनी यावेळी कोरोना महामारीमुळं राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, शेतकरी आंदोलन, नाशिक नियो मेट्रोयाविषयांवर भाष्य केलं आहे. त्याशिवाय महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असंही ते म्हणाले आहेत.

विधानसभेत बहुमत असणाऱ्या सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन नियमात बसणारे १२ लोक ठरवले आहेत. राज्यपाल त्यांची भूमिका जाहीर करतील अशी अपेक्षा करतील, अशी अपेक्षा असल्याचं अजित पवार म्हणाले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांनी विधानपरिषेदच्या १२ जागांबाबत आता अंत पाहू नये, असं पुण्यातही म्हटलं होते.

अजित पवार यावेळी बोलताना असंही म्हणाले की, पुढच्या वर्षी जिल्हा अंतर्गत चॅलेंज फंड अंतर्गत 50 कोटी फंड देणार आहे. यावेळेस आर्थिक ओढाताण असली तरी कोणत्याही वार्षिक योजनेला कट लावलेला नाही. कोव्हिड उपाययोजने करता नाशिकला 70 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्याचा निधी नियोजन समितीच्या माध्यमातून दिला जातो. शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येईल..

नाशिक नियो मेट्रो साठी राज्य सरकार देखील तरतूद करणार आहे. नागपूर आणि नाशिक मेट्रो बाबतचा राज्य सरकार आपला भाग उचलणार असल्याचं अजित पवारांनी सांगितले. येत्या काळात पोलीस भरती, सार्वजनिक आरोग्य विभागातील भरतीला प्राधान्य दिलं जाईल. १ लाख ५० हजार कोटी फक्त पगार आणि पेन्शन वर खर्च होतोय. मुंबई मेट्रो आणि लोकल च्या वेळेनमध्ये बदल करतो आहोत. केंद्राने देखील तसेच आदेश दिले आहेत.

अजित पवार यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना केंद्र सरकारनं दोन पावलं मागं यावं, असं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वीच्या आठवणींना उजाळा देताना भावुक झाले. तोच भावूकपणा शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला तर बरं होईल, असं अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडीत कोणतेही वाद नाहीत कोणताही निर्णय घेताना उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी एकत्र बसून घेतील, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंच्या भूमिकेविरोधात आमदार राजू पाटील, दि.बा.पाटलांच्या नावासाठी रस्त्यावर

News Desk

जम्मू-काश्मिरमध्ये ३७० कलम लागू होणार नाहीच- देवेंद्र फडणवीस

News Desk

ED, CBIच्या धाडीनंतर किरीट सोमय्या विचारतात, “प्रताप सरनाईक कुठे आहात?”

News Desk