HW News Marathi
Covid-19

देशात मद्यविक्री बंदच, नेमका काय आहे केंद्राचा निर्णय ?

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये केंद्राकडून काहीशी शिथिलता आणण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मॉल्स वगळता इतर दुकानदारांना लॉकडाऊनमधून अटी-शर्थींसह सवलत देण्यात आली आहे. मात्र, हॉटस्पॉट किंवा कंटेनमेंट झोनमध्ये या सवलती लागू होणार नाहीत. त्याचप्रमाणे, देशातील मद्यविक्री ही बंदच राहणार असल्याचे केंद्राकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. काहीच दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्याच्या महसूलवाढीसाठी मद्यविक्री सुरु करावी अशी मागणी केली होती. मात्र, आता थेट केंद्राकडूनच निर्णय आल्याचे मद्यविक्री बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आजपासून देशभरातील मॉल्स वगळता इतर दुकांनाना लॉकडाऊनमधून अटी-शर्थींसह सवलत देण्यात आली आहे. मात्र, केंद्राच्या आदेशानुसार यात कोणकोणत्या दुकानांचा समावेश होतो ते जाणून घेऊया :

देशातील कोणत्या दुकांनाना सशर्त परवानगी ?

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, लॉकडाऊनच्या काळादरम्यान शहरातील छोट्या-मोठ्या गल्ल्यांमध्ये असलेली दुकाने, रहिवाशी भागातही दुकाने त्याचप्रमाणे ग्रामीण भागात असणारी सर्व दुकाने सुरु ठेवण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, ई-कॉमर्सच्या सहाय्याने होणाऱ्या विक्रीला देखील परवानगी देण्यात आली आहे.

देशातील कोणत्या दुकांनाना परवानगी नाही ?

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, शहरातील मार्केट कॉम्पेलेक्स तसेच शॉपिंग मॉल्समधील दुकाने बंद राहतील. त्याचप्रमाणे एकाला एक लागून असलेली बाजारपेठेतील दुकाने, मुख्य म्हणजे दारुची कोणतीही दुकाने ही देखील बंदच राहणार आहेत. तसेच ग्रामीण भागांतील मार्केट कॉम्पेलेक्स आणि मॉल्सदेखील बंदच राहतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांना CBIकडून समन्स, १४ एप्रिलला होणार चौकशी

News Desk

खुशखबर ! उद्यापासून सर्वसामान्यांसाठीही धावणार बेस्ट बस

News Desk

“राज्यांनी सर्व करायचं तर केंद्र काय करणार?”, मोदींचा राज्यांना सवाल

News Desk