HW News Marathi
महाराष्ट्र

आघाडी सरकारच्या काळात सिडकोला जमीनी दिल्या | मुख्यमंत्री

नागपूर | पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवशी सिडको जमीन घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या अशी मागणी विरोधकांनी केली होती. परंतु आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्ताना जमिनी दिल्या आहेत. असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला.

विरोधकांनी अर्धी वस्तूस्थिती मांडली असून आघाडी सरकारच्या काळात ६६० हेक्टर जमिनीचे वाटप केले आहे. सिडको जमीन घोटाळा प्रकरणी त्यावेळीचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच चव्हाण यांच्या काळातील २०० प्रकरणाची होणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

विरोधी पक्ष नेत्यांनी राजीनामा द्यावेत, असा पवित्राही मुख्यमंत्र्यांनी घेतला. विरोधकांनी खोटे आरोप केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी सत्ताधारी आक्रमक झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शाळा, महाविद्यालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना! – देवेंद्र फडणवीस

Aprna

अनिल देशमुखांची साथ न दिल्याने शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज?

News Desk

‘ही’ आहेत मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यासह ३ मंत्र्यांची नवी निवासस्थाने

News Desk
देश / विदेश

सुनंदा पुष्कर प्रकरणात शशी थरुर यांना जामीन मंजूर

News Desk

नवी दिल्ली | काँग्रेस खासदार शशी थरुर यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने गुरुवारी त्यांचा जामीन मंजूर केला आहे. सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप थरुन त्यांच्यावर आहे. दिल्ली पोलिसांनी अटक करण्याच्या भितीने थरुन यांनी मंगळवारी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

या जामीन अर्जावर गुरुवारी (आज) सुनावणीत एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाच्या परवानगी शिवाय देश सोडून जाण्यावर थरुन यांना मनाई केली आहे.

सुनंदा पुष्कर १७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलच्या ३४५ क्र. खोलीत मृत अवस्थेत आढळल्या होत्या. सुनंदा पुष्कर यांचे शशी थरुन यांच्यासोबत २०१०मध्ये लग्न झाले होते. सुनंदा यांचा हा तिसरा विवाह होता. सुनंदा यांनी आत्महत्या केल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले होते.

Related posts

#PulwamaAttack : हवेत असो वा जमिनीवर, आम्ही तुम्हाला सोडणार नाही | भारतीय वायू दल

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये मिनिबस दरीत कोसळून २० जणांचा मृत्यू

swarit

मानवाच्या सबलीकरणासाठी स्वच्छ पर्यावरण | पंतप्रधान  मोदी

Gauri Tilekar