HW News Marathi
महाराष्ट्र

महापुरानंतर रोगराई वाढण्याची भीती, मेडिकल कॅम्प उभारले जाणार- अमित देशमुख

मुंबई | राज्यात पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक लोकांचे प्राण गेले आहेत आणि अनेकांची घरं उध्वस्त झाली आहेत. या सगळ्यामुळे कोरोचा प्रसार वाढण्याची भीती देखील आहे. लेप्टो, डेंग्यूसह इतर साथीचे रोग पसरु नयेत यासाठी पूरग्रस्त जिल्ह्यात मेडीकल कॅम्प उभारले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

जनतेची मदत करण्याची ही वेळ

कोरोना विषाणू अद्यापही नष्ट झालेला नाही. या पुरामुळे अजून रोगराई पसरण्याची शक्यता आहे. लेप्टो, डेंग्यू आणि इतर साथीचे रोग पसरू नये यासाठी पूरग्रस्त जिल्ह्यात मेडीकल कॅम्प उभारले जाणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे. तिथल्या तिथे मेडीकल सुविधा पोहोचवण्यासाठी डॉक्टरांची टीम रवाना केली गेली आहे. अतिरिक्त टीम पाठवण्यात येईल, असंही देशमुख म्हणाले. राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्यानं केंद्र आणि राज्य सरकारनं एकत्र येऊन जनतेची मदत करण्याची ही वेळ असल्याचं आवाहनही देशमुख यांनी यावेळी केलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दोन दिवसांपूर्वी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पूरस्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. नागरिकांना लागणारी सर्व मदत राज्य सरकारकडून केली जाईल. आरोग्य विभागाच्या दृष्टीनं पुराच्या तडाख्यात सापडलेल्या गावात एक डॉक्टर आणि नर्सेस यांचा गट तयार करुन ठेवण्यात आला आहे. त्यासोबत आरोग्यविषयक सर्व साहित्य, औषधांची कुमक पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर मोठ्या रुग्णालयात रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवण्यात येत आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

पुरग्रस्तांमध्ये लसीकरण वाढवणार

महाराष्ट्रात सध्या पावसाने हाहाकार माजवला आहे. एकीकडे नागरिक कोरोनाने ट्रस्ट आहेतच आता पुरामुळे अजून त्रास झाला हे दिसून येत आहे. संततधार पावसामुळे रोगराई वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पूरस्थिती भागात लसीकरण वाढवण्याची घोषणा केली आहे. राजेश टोपे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. कोकणात निर्माण झालेल्या परिस्थिती बघून त्यांनी ही घोषणा केली आहे.

राज्यात आधीच लसीकरण कमी प्रमाणात होत आहेत, यातच आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पूर भागात लसीकरण वेगाने करण्याची घोषणा केली आहे. आयसीएमआरने जे जे प्रोटोकॉल दिले, ते पाळले. आता जर त्यांनी काही गाईड लाईन दिल्या तर त्याच्यानुसार निर्णय घेतले. शाळा सुरू करा असं सांगितले तर आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बसून निर्णय घेऊ, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे शिथीलता देण्याबाबत रिपोर्ट मागवत आहोत. काही ठिकाणी शिथीलता देण्यात येतील का याचा रिपोर्ट मागवला आहे, लवकरच त्याचा निर्णय घेण्यात येईल, असं टोपे म्हणाले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘विरोधी पक्ष मोकळा आहे, डोकं रिकामं असतं’, संजय राऊतांची विरोधकांवर टीका

News Desk

साईबाबांच्या जन्मस्थळावरून राजकारण करून नका !

swarit

ठाकरे सरकराचा अधिवेशनातून पळ, लोकशाहीचा कुलुप ! फडणवीस भडकले

News Desk