HW News Marathi
देश / विदेश

“लवकरच ठाकरे सरकार कोसळणार…”, अमित शहांचे मोठे विधान

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी स्थापीत केलेले महाविकासआघाडीचे सरकार लवकरच कोसळणार असा दावा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून वारंवार केला जात आहे. यात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मोठे वक्तव्य केले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत सगळ्यांनीच लवकरच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे सरकारबाबत मोठं विधान केलं आहे. त्यामुळे शहा यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढण्यात येत आहेत.

अमित शहा यांनी ‘टाइम्स नाऊ’ला विशेष मुलाखत दिली आहे. त्यात त्यांना राज्यातील ठाकरे सरकार किती दिवस चालेल असा सवाल करण्यात आला होता. त्यावर शहा यांनी थेट उत्तर दिलं. शिवसेनेने आमच्या सोबत निवडणूक लढवली होती. शिवसेना हा आमचा छोटा मित्र पक्ष होता. त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची मोकळीक दिली होती. हे सरकार त्यांच्या ओझ्यानेच कोसळेल, असा आमचा विश्वास आहे. आम्हाला काहीही करावं लागणार नाही, असं शहा म्हणाले आहेत.

अमित शहांनी डिवचले

अमित शहा यांनी अगदी मोजक्याच शब्दात आपली भूमिका मांडली आहे. परंतु, त्यातून त्यांनी शिवसेनेला डिवचले आहेत. या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेला छोटा मित्र पक्ष म्हटलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीत शिवसेना हाच मोठा पक्ष राहिला आहे. किंबहुना शिवसेनेच्या खांद्यावरच राज्यात भाजप मोठा झाला आहे. दरम्यान, अमित शहा यांनी थेट भाजप सरकार पाडणार असं म्हटलं नाही. मात्र, ठाकरे सरकार कोसळणार हे सांगून त्यांनी संकेत दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोणी केली केरळला अर्थिक मदत, जाणून घ्या…

News Desk

पंतप्रधान मोदींचा सोशल मीडियावरून संन्यास घेण्याचा विचार

swarit

शहरात नेमके किती खड्डे | सर्वोच्च न्यायालय

News Desk