HW News Marathi
महाराष्ट्र

‘कंगनाविरोधात अटक वॉरंट काढू’, अंधेरी कोर्टाचे संकेत

मुंबई | प्रसिद्ध कवी जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या फौजदारी तक्रारीवर अंधेरी कोर्टात आज सुनावणी पार पडली. दरम्यान यावेळी कंगना उपस्थित नसल्याने कोर्टाने संताप व्यक्त केला. इतकंच नाही तर पुढील सुनावणीला कंगना गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट काढू असं स्पष्ट सांगितलं आहे. २० सप्टेंबरला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

नेमकं काय घडलं?

कंगनाला करोनाची लक्षणं आढळली असून करोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप रिपोर्ट आलेला नाही अशी माहिती तिचे वकील रिझवान सिद्दिकी यांच्याकडून देण्यात आली. त्यावर जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांच्याकडून आक्षेप नोंदवण्यात आला. यावर भारद्वाज यांनी गेल्यावेळीदेखील कंगना पुढील सुनावणीस उपस्थित राहील सांगत गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली होती याकडे लक्ष वेधलं आहे.

यानंतर सिद्दीकी यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलं असल्याची माहिती दिली. हाच डॉक्टर साक्षीदार असून कंगनाने चित्रपट प्रमोशनच्या वेळी अनेक लोकांची भेट घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. भारद्वाज यांनी यावेळी सुनावणीला उशीर होत असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली. तसंच परवानगी नव्हती तो दिवस वगळता तक्रारदार प्रत्येक सुनावणीला उपस्थित असल्याचं लक्ष वेधलं.

काय म्हणाले अख्तर ?

एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले, “भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद आणि बजरंद दल अफगाणिस्तानमधील तालिबान सारख्याच कट्टरतावादी संघटना आहेत. या संघटनांच्या मार्गात भारताचं संविधान अडसर ठरत आहे. यांना थोडीशी जरी संधी मिळाली तर हे कोणताही संकोच बाळगणार नाहीत. भारतात अल्पसंख्यांक समाजासोबत झालेल्या मॉब लिंचिंगच्या घटना म्हणजे तालिबानसारखं बननण्याआधीची रंगीत तालिम आहे. हे सर्व लोक एकच प्रकारचे आहेत. यांची केवळ नावं वेगळी आहेत.”

दरम्यान, केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनीही जावेद अख्तर यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद निस्वार्थी भावनेने काम करत आहेत. जावेद अख्तर यांनी चुकीचं विधान केलं असून त्यांनीच तालिबानमध्ये जावं, असा अजब सल्ला कपिल पाटील यांनी दिला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहीहंडी समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Aprna

सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा! – जयंत पाटील

Aprna

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील पाणीपुरवठा योजनेचे ई- भूमिपूजन

Aprna