HW News Marathi
Covid-19

देवाच्या कृपेने मला कोरोना झाला नाही – अनिल देशमुख

पुणे | ” गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात कोरोनाचे संकट आहे. या संकटाच्या काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे, मी स्वस्थ बसलो नाही. माझ्या मतदारसंघासह तीस जिल्ह्याचा दौरा मी केला. पण, मला कोरोना झाला नाही ही तर देवाजी कृपा आहे ! असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

वास्तविक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने विरोधक आरोप करीत आहेत की मुख्यमंत्र्यांनी घराच्या बाहेर पडायला हवे. मात्र जर कार्यालयात बसून प्रश्‍न सुटत असतील तर बाहेर पडण्याची गरज काय असा सवाल शिवसेनेतर्फे विरोधकांना केला जात आहे.

“देवाची कृपा आहे. त्यामुळेच मला कोरोना झाला नाही. मी आजपर्यंत तीस जिल्ह्यांचे दौरे केले आहेत. पहिल्या दिवसापासून मी सतत दौरे करीत आहेत. लोकांच्या अडीअडचणी सोडवित आहेत. गेली २१ वर्षे मंत्री आहे. सरळ मार्गी असावे असा माझा स्वभाव आहे. अनेक वर्षे मंत्री म्हणून काम केल्याचा पाठिशी अनुभव आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आजपासून राज्यातील १४ जिल्ह्यात पूर्णपणे अनलॉक,

Aprna

मुंबईत नाईट क्लब बंद होऊ शकतात, पालकमंत्र्यांचा इशारा

News Desk

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, १८ वर्षांवरील सगळ्यांना मोफत लस दिली जाणार?

News Desk