HW News Marathi
महाराष्ट्र

“होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी”, गृहमंत्र्यांचा दानवेंना पलटवार!

मुंबई | भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकार हे अमक, अकबर, अँथनीचे सरकार आहे असे म्हटले होते. याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पलटवार केला आहे “महाराष्ट्रतील सरकार आम्हाला पाडायचं नाही. राज्यात अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असून, या तिघांचे पायात पाय आहेत. त्यामुळे त्यांचे तेच पडतील,” असं विधान केंद्रीय कृषी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल (६ ऑक्टोबर) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केले होते. यावरून

“रावसाहेब दानवे म्हणाले महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो. कारण – होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथनी,” असं म्हणत देशमुख यांनी दानवेंना टोला लगावला. त्यांनी ट्विटरवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते दानवे?

रावसाबेब दानवे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारवर देखील निशाणा साधत महाराष्ट्रात ‘अमर, अकबर आणि अँथनी’चे सरकार आहे. ते पायात पाय अडकून पडेल. मात्र, आम्ही सरकार पाडणार नाही, अशा शब्दांत दानवे यांनी टिका केली आहे. विरोधक चुकीचे आरोप करीत आहेत. ते खोडून काढण्याचे आमचे काम आहे. आम्ही विरोधकांना घाबरत नाही. आमच्याबाबत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न होत आहे. गेली सहा वर्ष विरोधकांकडे मुद्देच नाहीत. त्यातून ते कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर आरोप करीत आणि रस्त्यावर उतरत आहेत. केंद्र सरकार बाजार समित्या बंद करणार नाही.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मर्यादित काळासाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय दिशाहीन, हास्यास्पद व निरर्थक”- अतुल भातखळकर

News Desk

शरद पवार नाराज असतील तर हे महाराष्ट्राचं मोठं नुकसान!

News Desk

राज्याचे “कौशल्य श्रेणीवर्धन धोरण” जाहीर; राजेश टोपेंची माहिती

Aprna