HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात काहीही नवे घडले की माझ्याच नावाची चर्चा !

मुंबई ।“राज्यात काहीही नवे घडले की माझ्याच नावाची चर्चा होते. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी सुरु असलेली ही चर्चा देखील नवीन नाही”, असे विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. लोकसभेनंतर महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रकांत पाटील यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती मिळत होती. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील बोलत होते. राज्यात काहीही झाले कि माझ्याच नावाची चर्चा सुरु होते. त्यामुळे त्यात काही नवे नाही असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे पाटील यांना ग्राहक संरक्षण राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. यानंतर भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार ? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यावेळी महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रकांत पाटील यांच्यासह विनोद तावडे, संभाजी पाटील निलंगेकर, गिरीश महाजन, डॉ.रणजित पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…म्हणजे मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का?” फडणवीसांचा सवाल

News Desk

बीडमध्ये अतिरिक्त ऊसाचा पहिला बळी; संतप्त शेतकऱ्याने ऊस पेटवून ऊसाच्या शेतामध्ये केली आत्महत्या

Aprna

शरद पवारांचा जबरा फॅन, पाठीवर गोंदवला पर्मनंट टॅटू

News Desk