HW News Marathi
महाराष्ट्र

“महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेससोबत जंगलाचे युवराज युती करुन बसले आहेत”, आशिष शेलारांचा टोला 

मुंबई | बिहारमध्ये एनडीएचीच सत्ता प्रस्थापीत झाली.बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून NDA ने १२५ जागांवर विजय मिळवला. या १२५ जागांमध्ये ७४ जागा भाजपने, ४३ जागा जदयूने तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. बिहार निवडणुकांमधील विजयानंतर भाजपामध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसंच अनेकांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंदेखील कौतुक केले आहे. दरम्यान, या विजयानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

“काँग्रेसने महाराष्ट्रात ‘हातात’ ‘धनुष्यबाण’ धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला. आता महाराष्ट्रातदेखील जनतेच्या ‘घड्याळाचे’ काय सांगावे टायमिंग…? पंचायत ते पार्लमेंट मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच! त्यांच्यासह नितीश कुमारजी, देवेंद्रजीं फडणवीस यांचे अभिनंदन,” असं म्हणत शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

तर “भ्रष्टाचारी काँग्रेससोबत सलगी केलेल्या ‘जंगलराज का युवराज’ला बिहारच्या जनतेनं नाकरलं. महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेससोबत ‘जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज’ युती करुन बसलेत. समजनेवाले को इशारा काफी है,” असंही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेट्रो कारशेडबाबत खूल्या चर्चेला या!आदित्य ठाकरेंना भाजप नेते आशिष शेलार यांचे जाहीर आवाहन

News Desk

देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूर दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘या’ केल्यात मागण्या!

News Desk

गँगस्टार शरद मोहोळच्या पत्नीने केला चंद्रकांत पाटलांचा सत्कार, प्रवेश मात्र टाळला!

News Desk