HW News Marathi
महाराष्ट्र

आता हे तुम्ही करताय ते पुण्य? आम्ही पर्यावरणपूरक दिवे लावले ते पाप?

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोठी सरकारनं वीज बचत व्हावी व पर्यावरण पूरक म्हणून मुंबईत एलईडी दिवे लावण्यास सुरुवात केली, तेव्हा क्वीन नेकलेसची शोभा जाईल, असे म्हणण्यात आले होते. हे जे ओरडत होते त्यांनी क्वीन नेकलेसच आता तोडला त्याचे काय? असा सवाल करीत हा दुटप्पीपणा, ढोंगीपणा असल्याचा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. आता हे तुम्ही करताय ते पुण्य? आम्ही पर्यावरणपूरक दिवे लावले ते पाप? असा खोचक सवाल देखील आशिष शेलार यांनी शिवसेनेला केला आहे.

अखेर झाले काय? तर शोभा वाढलीच! पण..आता क्वीन नेकलेसची माळ हे तोडून टाकत आहेत. क्वीन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय? आता पारसी गेट तोडलाच…समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा पण खाणार, अशी जहरी टीका अशिष शेलार यांनी केली आहे. आता या परिसराची शोभा घालवली जाणार आहे.

आता हे तुम्ही करताय ते पुण्य? आम्ही पर्यावरणपूरक दिवे लावले ते पाप? असा सवाल देखील आशिष शेलार यांनी केली आहे. झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड? मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या “ढोंगीपणाचा गाळ” दिसला ना अशा सूचक शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफी २ लाखापर्यंत, जाणून घ्या काय आहे ‘अध्यादेश’

News Desk

शिवाजी महाराजांच्या जागी आम्ही उदयनराजेंना मानतो…

swarit

मुंबई लोकल बाबतीत राजकरण नको, गृहमंत्र्यांनी खडसावले

News Desk