HW News Marathi
महाराष्ट्र

सरासरी राज्य सरकारने वीज ग्राहकांसोबत बनवाबनवी केली – आशिष शेलार

मुंबई | वीज बिलाच्या मुद्द्यावरुन राज्य शासनानs दिलेला शब्द न पाळल्यामुळं आता सर्वसामान्य जनतेसोबकतच विरोधी पक्षानंही सत्ताधाऱ्यांना आरोपांचा विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं होतं.

सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर संताप व्यक्त करत आणि थेट उर्जामंत्र्यांवर निशाणा साधत भाजपच्या आशिष शेलार यांनी एक ट्विट केलं आहे. राज्य सरकारच्या काही निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं, “सरासरी” विचार करुन विद्यार्थ्यांची जशी फसवणूक केली. तशीच बनवाबनवी “सरासरी राज्य सरकारने” वीज ग्राहकांसोबत ही केली. वाचाळवीर मंत्री आधी वीज बिलात सवलत देतो म्हणाले आता शब्द फिरवला..अनैतिकतेतून जन्मलेल्या आणि राज्याला अराजकतेकडे नेणाऱ्या सरकारला जनताच झटका देईल!

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मराठा आरक्षणासंदर्भात अशोक चव्हाण आणि शरद पवार यांच्यात बैठक

News Desk

‘त्यात चुकीचं काय केलं’, अदानी एअरपोर्ट नामफलक हटवल्याच संजय राऊतांकडून समर्थन…!

News Desk

एअर इंडियाला येणार ‘अच्छे दिन’?; सरकारने टाटांची बोली स्वीकारली, लवकरच होणार मालकी हस्तांतरण

News Desk