HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईला विभाजीत करण्याच्या कॉंग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुख संमती, आशिष शेलारांचा आरोप

सिंधुदुर्ग | या सरकारची मनोवृत्तीच असुरक्षित आहे. असुरक्षित मनोवृत्तीत सरकार काम करतय. त्यामुळेच या सरकारने भाजपा आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे अशी टीका करताना मुंबईला विभाजीत करण्याच्या कोंग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुख संमती आहे असा आरोप भाजप नेते आणिआमदार आशिष शेलार यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. पोलिसांनी जनतेची सुरक्षा करावी हे अपेक्षित आहे आणि या भुमिकेतून जर राज्य सरकारचा निर्णय असेल तर त्यावर टीका उगाच करावी अशी आमची इच्छा नाही.

मात्र, ज्या पद्धतीने त्या यादीमधे भाजपच्या आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांची सुरक्षा काढण्याचा जो निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्याचं वर्णन करायचं तर असुरक्षित मनोवृत्तीच्या सरकारने घेतलेला हा निर्णय आहे. या सरकारची मनोवृत्तीच असुरक्षित आहे. असुरक्षित मनोवृत्तीत सरकार काम करतय आणि त्यामुळे अजून एक चुकीचा निर्णय कोणतही वैज्ञानिक किंवा अभ्यासाच्या दृष्टी कोणातून न घेता राजकीय दृष्टीकोणातून घेतलेला हा निर्णय असल्याची टीका भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

शिवसेने सोबत सत्तेत बसलेल्या कॉंग्रेसने आणि कॉंग्रेसचे नेते तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी २ आयुक्त नेमण्याची मागणी केली. मुंबईला विभाजीत करण्याच्या कॉंग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुख संमती आहे असा आमचा आरोप असल्याचा थेट हल्ला आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केला. जर शिवसेनेची भुमिका ताठर असेल संयुक्त मुंबई, एकसंघ मुंबई अशी असेल तर त्यांनी कॉंग्रेसला खडेबोल सुनावले पाहीजे नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घातली पाहीजे.

मात्र, या दोन्ही गोष्टी न करता केवळ धुळफेक करण्याचं काम शिवसेना करत आहे. पण,भारतीय जनता पार्टीला मुंबईचं विभाजन या कुठल्याही गोष्टी मान्य नाहीत. अशा पद्धतीने मुंबईचं विभाजन कॉंग्रेस आणि मुखसंमती दिलेल्या शिवसेनेचा मुंबई तोडण्याचा प्रयत्न असेल तर जनता स्विकारणार नाही आणि भाजप या दोघांच्या विरोधात आंदोलन करेल असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज द्या! – मुख्यमंत्री

Aprna

सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय आल्यावर ईडीला सामोरं जाणार- अनिल देशमुख

News Desk

बुलडाण्यात बैलांची दुधाने आंघोळ घालत स्वाभिमानी संघटना आंदोलनात सहभागी

News Desk