HW News Marathi
महाराष्ट्र

“मराठा समाजाला एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करु नका”, आशिष शेलारांचा सरकारला इशारा

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. यानंतर राजकारण चांगलचं पेटलं. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सरकारची कोंडीच केली आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी सरकारच्या या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.महाविकास आघाडीमध्ये सगळं हास्यास्पद सुरु असल्याची टीका त्यांनी केली आहे. त्याचबरोबर सरकारनं सर्वोच्च न्यायालयासमोर मराठा आरक्षणातले महत्त्वाचे मुद्दे नीट मांडले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मराठा समाजाची दिशाभूल करत समाजाला एप्रिल फूल कऱण्याचा कार्यक्रम करु नका अशा शब्दात त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले. त्याचबरोबर ते पुढे म्हणतात, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोच चव्हाण यांनी आरक्षणाचं जाऊद्या, सवलती द्या अशी भूमिका घेतली आणि काल मंत्री राज्यपालांची भेट घेताना आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. या त्यांच्या भूमिकेमुळे आता तुम्हाला आरक्षण नक्की द्यायचं आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. हे सरकार मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

त्याचबरोबर ते असंही म्हणाले की, मराठा आरक्षणाबद्दलच्या गायकवाड अहवालाचं भाषांतर करण्यात आलं नाही आणि त्यामुळे या अहवालातले प्रमुख मुद्दे योग्य पद्धतीने समोर आले नाहीत. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सुसूत्रता नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांचे विरोधक, बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं निधन

News Desk

पंकजा मुंडेंच्या टीकेसंबंधी विचारताच फडणवीस पत्रकार परिषद सोडून निघून गेले

News Desk

आम्ही सरकार पाडणार नाही तर ,’अमर, अकबर आणि अँथनी’चे सरकार पायात अडकूनच पडेल

News Desk