HW News Marathi
महाराष्ट्र

अशोक चव्हाणांना आतापासून मुख्यमंत्रपद देण्याचा कार्यकर्त्यांचा खटाटोप

नांदेड: केंद्र तसेच राज्यातील निवडणुका एक-दीड वर्ष दूर आहे, पण नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसजनांनी खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आणि आमदार अमिता चव्हाण यांना खासदारकी अशी पदांची वाटणी येथे जाहीर करून टाकली. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्ती, खासदार राजीव सातव यांनीही या वाटणीला अनुकूलता दर्शवताना चव्हाण यांनी टिळक भवनातून ह्यवर्षांह्णवर जावे, असा सदिच्छापर वर्षांवही केला!

खासदार अशोक चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी ते आपल्या कर्मभूमीत दाखल झाले. याच निमित्ताने जिल्हा आणि शहर काँग्रेस समितीच्या वतीने शुक्रवारी रात्री चव्हाण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या वेळी नांदेडबाहेरून खासदार सातव यांच्यासह आमदार अब्दुल सत्तार, काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांची तसेच जिल्ह्यातील आजी-माजी आमदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार?”

News Desk

प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक आज ईडीसमोर हजर होणार

News Desk

मराठा समाजाचे मुंबईत ठिय्या आंदोलन

News Desk
राजकारण

राज ठाकरे, विश्वजीत कदम एकत्र

swarit

सांगली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सांगलीत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वतुर्ळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे शनिवारी एका कार्यक्रमासाठी सांगलीत आले होते. आज सकाळी दहाच्या सुमारास ते अनपेक्षितपणे विश्वजित कदम यांच्या भेटीसाठी भारती रूग्णालयात पोहोचले. रुग्णालयात आल्यानंतर विश्वजीत कदम यांनी राज यांचे स्वागत केले. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर आणि अन्य पदाधिकारी होते. रुग्णालयातील एक केबिनमध्ये सुरूवातीच्या गप्पा झाल्यानंतर विश्वजित कदम यांनी सर्वांना बाहेर जाण्याची विनंती केली. त्यानंतर बंद दरवाज्याआड राज आणि विश्वजित कदम यांच्यात तब्बल २० मिनिटे चर्चा सुरू होती.

Related posts

#LokSabhaElections2019 : पंतप्रधान मोदींनी ट्विट केला निवडणूक प्रचाराचा पहिला व्हिडीओ

News Desk

येत्या काही तासांत मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

Aprna

माझे वक्तव्य काँग्रेस विरोधात, लष्करप्रमुखांच्या विरोधात नाही !

News Desk