HW News Marathi
देश / विदेश

लातूरमधून जम्मू-काश्मीरचे ४ जण ताब्यात, दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय

लातूर | जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनांसाठी काम करणाऱ्या ४ संशयिताना महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) लातूरमधून ताब्यात घेतले आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये हात असल्याच्या संशयावरून या ४ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अब्दुल रजाक, शब्बीर अहमद (२५), सलील अहमद आणि इफ्तियाज अहमद (३५) ही एटीएसकडून ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे चौघेही २ दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरहून नांदेडमध्ये आले होते.

नांदेड जिल्ह्यातील एटीएस टीम बुधवारी (१५ मे) लातूरमध्ये दाखल झाली. यावेळी संशयास्पद स्थितीत आढळलेल्या ४ जणांना चौकशीसाठी एटीएसकडून ताब्यात घेण्यात आले. त्याचप्रमाणे एटीएसकडून त्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांचे कॉल रेकॉर्डर देखील तपासले जात आहेत. त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनेशी या ४ व्यक्तींचा नेमका काय संबंध आहे, याचा देखील शोध एटीएसकडून घेतला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतचे वडील म्हणतात, सुशांतने आत्महत्या केलीही असेल !

News Desk

सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, भारत जशास तसे उत्तर देण्यास सक्षम !

News Desk

अरूण जेटली 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार

News Desk