HW News Marathi
महाराष्ट्र

राहुल गांधी यांचे लग्न कधी होईल हे त्यांनी आधी सांगावे, भातखळकरांचा कॉंग्रेसला सवाल

मुंबई | सामाजिक न्याय मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून केली जात आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपचे काही नेते ही टेन्शन मध्ये येतील असं कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले होते. यावरही भातखळकरांनी भाष्य केले आहे. राहुल गांधी यांचे लग्न कधी होईल हे त्यांनी आधी सांगावे, असा उलट प्रश्नच त्यांनी विचारला आहे.

काय आहे प्रकरण?

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी एक घटना घडली आहे. कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करत एका तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज एका महिलेने दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी दिली आहे. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत तिने ही माहिती दिली आहे. याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहे. १० जानेवारीला याबाबतची तक्रार दिली. ११ जानेवारीला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्विकारण्यात आला आहे. २००६ पासून अत्याचार सुरु होते. पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारामती विरुद्ध माढा, पाण्याचे बाप कोण?

News Desk

वर्नोन गाेन्सालवीस, अरुण फरेरा काेर्टात हजर

News Desk

आता शरद पवार अन् अजित पवार येतील कि काय ?

News Desk