HW News Marathi
महाराष्ट्र

लसीकरण मोहीम आणि मुख्यमंत्र्यांच्या संवाद शैलीवर अतुल भातखळकरांची खोचक टीका

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु आहे. पण लसींचा तुटवडा भासत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांकडून वारंवार सांगण्यात येतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्राला मिळणाऱ्या कोरोना लसीचं प्रमाण कमी असल्याचं म्हटलंय. यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ठाकरे यांच्या संवादशैलीवरुन भातखळकर यांनी खोचक ट्वीट केलं आहे.

“लस उपलब्ध नाही कारण साठा नाही. साठा आहे पण लसीकरण होणार नाही.याचा अर्थ असा नाही की लसीकरण बंद आहे. लसीकरण सुरूच आहे. सर्वांना लस मिळेल. याचा अर्थ कुणीही जाऊन लस घेऊ शकतो असा नाही. नोंदणी करा मग लस मिळेल. पण नोंदणी केली तरी लस मिळेलच असं नाही. – पक्षाचे मुख्यमंत्री”, असं ट्वीट करुन भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. भातखळकरांच्या या टीकेला शिवसेनेकडून कशाप्रकारे उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार पहाटे ६ वाजता ॲान फिल्ड! पुणे मेट्रो कामाचा घेतला आढावा ….

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार

News Desk

भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची अडवली गाडी, नार्वेकर म्हणाले, “चला यांना गाडीत टाकून शिवबंधन बांधू”!

News Desk