HW News Marathi
महाराष्ट्र

हसन मुश्रीफांचे फडणवीस आणि पाटलांवरील आरोप अत्यंत बालीश,भाजपचा पलटवार !

मुंबई | राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. ‘राज्यपाल नियुक्त आमदारांची सरकारकडून येणारी नावे बाजूला काढून ठेवण्याचं ठरलं आहे,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांशी याबाबत चर्चा केली आहे.’असा गौप्यस्फोट त्यांनी केला. राज्यपालांची त्यांच्याशी चर्चा झाली आहे. ही आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचं ठरलं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हंटल्याचे माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

यावर एच. डबल्यू मराठीशी भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी बातचीत केली. ते असे म्हणाले की, “ १२ नावं बाजूला काढायला ती काही कोथिंबीर किंवा मेथीची जुडी आहे का ? राज्यपाल नियुक्त जागांसाठी मंत्रीमंडळ शिफारस करण्याचीच पद्धत असते, घटनाच तशी आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे चंद्रकांत पाटील कोणाच्यातरी तरी घरी गेले असताना त्यांनी असे उद्गार काढले हे मुश्रीफांनी आज सांगितलं. पण या घटनेला १ महिना झाला आहे. तेव्हाच त्यांनी या घटनेची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला का नाही दिली? आता असले बालीश आरोप ते का करत आहेत कारण या सरकारचे जे अपयश आहे, ‘&कोरोनाचं, शेतकऱ्यांच्या मदतीचं’त्याच्यावरुन लोकांचं दुर्लक्ष व्हाव यासाठी या राजकीय पुड्या सोडण्याचं काम सुरु आहे, असा आरोप अतुल भातखळकर यांनी आघाडी सरकारवर केला आहे.

“तसेच, मुख्यमंत्री आणि हसन मुश्रीफ यांना इतकेच सांगणे आहे की, जर का १२ नावं ठर ठरवली आहेत तर ती महाराष्ट्राच्या जनतेला सांगावी.राज्यपालांच्या पदाला अजिबात प्रतिष्ठा न देतां अतिशय घाणेरड्या भाषेत त्यांच्यावर टीका करणे हे महाविकास आघाडीचे धोरण आहे. याचा नमुना आपण मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात पाहिला. काळी टोपी त्याखाली मेंदू आहे का अशा भाषेत राज्यपालांची टिंगल टवाळी केली. राज्यपाल हे घटनेला धरुन काम करत असतात. राज्यपाल पदाचं अवमुल्यन करण्याचे काम सरकार करत आहेत”, असा आरोपही यावेळी भातखळकरांनी महाविकास आघाडी सरकारवर केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी

Aprna

“फडणवीसांनी वणवण फिरण्यापेक्षा नागपुरातच बसावं”, प्रकाश आंबेडकरांनी डिवचलं

News Desk

भाजपने फसविले असे वाटत तर आमच्या व्यासपीठावर यावे !

News Desk