HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकारला आता ‘हिंदू’ शब्दाचे सुद्धा वावडे- अतुल भातखळकर

मुंबई | अजान मधून मनशांती मिळणाऱ्या ठाकरे सरकारने आता दहावी व बारावीच्या परीक्षा फॉर्म मधून हिंदू शब्द वगळल्यामुळे ठाकरे सरकारला हिंदू धर्मासोबतच आता हिंदू शब्दाचे सुद्धा वावडे झाले असल्याची टीका मुंबई भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा फॉर्म मध्ये धर्माच्या रखान्यातुन हिंदू शब्द वगळून अल्पसंख्याकेत्तर (नॉन-मायनॉरिटी) असा उल्लेख केला आहे. मंदिरे सुरू करण्यासाठी तब्बल 6 महिने उशीर करणे, आषाढी वारीसाठी दिलेल्या बससाठी भाडे आकारणे, हिंदूंच्या साधूंचे हत्याकांड होऊनही आरोपींच्या विरोधात कडक कारवाई न करने आणि आता चक्क हिंदू शब्दच वगळणे यातून ठाकरे सरकार ‘काहींना’ खुश करण्यासाठी आणि आपली मतपेटी सांभाळण्यासाठी सतत हिंदू विरोधी निर्णय घेत आहे, असा आरोप सुद्धा अतुल भातखळकर यांनी केला आहे.

याप्रकरणी अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून तीव्र निषेध व्यक्त केला असून २४ तासांत हा फॉर्म मागे घेऊन त्यात हिंदू धर्माचा उल्लेख न केल्यास भारतीय जनता पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा भातखळकर यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकात आज पोटनिवडणूक, भाजपची अग्निपरीक्षा

News Desk

“माझा बॉडीगार्ड गोविंद या दुष्ट Corona ने टिपला”, पंकजा मुंडेंचे भावनिक ट्विट 

News Desk

“मी असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे”- उदयनराजे भोसले

News Desk