HW News Marathi
Covid-19

ऑस्ट्रेलियाने १५ मेपर्यंत रद्द केली भारतातून येणारी प्रवासी विमाने

मुंबई । भारतातील वाढता कोरोना कहर पाहता जगभरातून तीव्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. भारतातील वाढती

रुग्णसंख्या पाहाता अनेक देशांनी आपल्या नागरिकांवर भारतातून प्रवास करण्यापासून बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलिया हा त्याचपैकी एक देश आहे. ऑस्ट्रेलियाने कठोर निर्णय घेत भारतातून ऑस्टेलियाला जाणारी सर्व प्रवासी विमाने रद्द केली आहेत.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन याबाबत घोषणा करताना म्हणाले की, “भारतातून ऑस्टेलियाला जाणारी सर्व प्रवासी विमाने रद्द करण्यात आली असून येत्या १५ मे पर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. भारतातून येणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोना धोका वाढू शकतो म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.” यापूर्वी थायलंड, नेदरलँड, इराण, कॅनडा, युएई, हाँगकॉंग या देशांनीसुद्धा भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.

सध्या भारतात आयपीएल सुरू आहेत. त्यासाठी ऑस्ट्रेलियातील अनेक खेळाडू आणि काही नागरिक भारतात आले आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयानुसार आता त्यांना देखील १५ तारखेपर्यंत भारतातून ऑस्ट्रेलियाला परतता येणार नाही. दरम्यान, भारतातील कोरोनाचा कहर हा जगभरात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप खासदाराकडून ठाकरे सरकारचे कौतुक, दिली शाबासकीची थाप

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य शिवसेना खासदार राहुल शेवाळे मानखुर्दमध्ये राबवणार ‘प्लाझ्मा दान संकल्प अभियान’

News Desk

उद्धवजी मुख्यमंत्री होऊ नयेत, म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेल्या काही लोकांबद्दल सहानुभूती !

News Desk