HW News Marathi
महाराष्ट्र

दिवाळी आधी मदत मिळणार, सरकार शेतकऱ्यांसोबत असून कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही – बच्चू कडू

अमरावती | जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतीच्या बांधावर जाऊन पावसाने किती नुकसान झाले आहे याची पाहणी केली. अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सोयाबीन आणि कपाशी पिकांची पाहणी करुन, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. “शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळेल”, असे आश्वासन यावेळी मंत्री बच्चू कडू यांनी दिलं आहे.

बच्चू कडू यांनी थेट शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतल्याने, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सर्वांना सरसकट नुकसान भरपाई मिळेल असं यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना सांगितलं. राज्य सरकार शेतकऱ्यांसोबत असून, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संभाजीराजे, नाक दाबल्याशिवाय ठाकरे सरकारचं तोंड उघडणार नाही! – चंद्रकांत पाटलांचा सल्ला

News Desk

“त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलीच नाही”, देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका

News Desk

जलजागृती सप्ताहानिमित्त अकोला येथे ‘वॉटर रन’द्वारे जनजागृती

Aprna