HW News Marathi
महाराष्ट्र

फीसाठी जर सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे, बच्चू कडुंचा शिक्षण संस्थेला इशारा

अमरावती | कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांकडून ५० टक्के शुल्क आकारावे, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली. गेल्या काही दिवसांमध्ये शाळांकडून पालकांना फी भरण्यासाठी सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर आले. या तक्रारींची दखल बच्चू कडू यांनी घेतली आहे. ज्या संस्था या पालकांच्या भरवश्याने मोठ्या झाल्या अशा संस्था फक्त एक वर्ष अर्धी फी घेऊ शकत नाही का? जर तुम्ही सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे हे शिक्षण संस्थांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.

सध्या कोरोना महामारीमुळे अनेक पालक आर्थिक संकटात आहेत. अशा वेळी त्यांच्यासोबत शिक्षण संस्थांनी उभे राहावे असे आवाहनही बच्चू कडू यांनी केले. जर शिक्षणसंस्थांनी ऐकले नाहीतर सरकार म्हणून आम्हाला कारवाई करावी लागेल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

आतापर्यंत शिक्षणसंस्था या फायद्यात होत्या. एखाद्या संस्थने सांगावे की आमची संस्था तोट्यात आहे. गेल्या २० वर्षांपासून या संस्थांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या फी वर आम्ही कधी बोललो नाही. पण आता हे संकट मोठ त्यामुळे किमान यावर्षी विद्यार्थ्यांकडून शिक्षण संस्थांनी ५० टक्केच फी आकारावी, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“मी राज्यपालांचा लाडका मंत्री”, महाविकासआघाडी सरकारमधील ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

News Desk

फडणवीस दिल्लीश्‍वरांचे पाय चाटतात | विनायक राऊत

News Desk

राज्यात पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा उपलब्ध करू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दावा

News Desk