HW News Marathi
Covid-19

मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द ? सरकारच्या निर्णयात राज्यपालांनी हस्तक्षेत करावा !

मुंबई | राज्य सरकारने मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केल्याने आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने काल (१४ मे) राज्यपालांची मुंबईत भेट घेतली आहे. या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालून मागासवर्गीयांना पदोन्नतीमधील आरक्षणाचा अधिकार मिळवून द्यावा अशी मागणी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाकडून यावेळी करण्यात आली आहे.

पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना ३३ टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. यानिर्यानीसार आता पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे आता २५ मे २००४ च्या सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. या निर्णयामुळे शासकीय सेवेतील पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द झाले आहे. म्हणूनच राज्य सरकारच्या या निर्णयात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

राज्यात मराठा आणि संपूर्ण देशात क्षत्रिय समाजातील राजपूत,ठाकूर आदी जातींना आर्थिक निकषावर स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी हस्तक्षेप करावा तसेच महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. पण राज्य सरकारने मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करून त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे, या प्रकरणात राज्यपालांनी हस्तक्षेप करून मागासवर्गीयांना पदोन्नतीमधील आरक्षणाचा अधिकार मिळवून द्यावा अशी मागणी रामदास आठवले यांनी यावेळी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : राज्यात आत्तापर्यंत ५००० जण कोरोनामुक्त

News Desk

आता ‘कोरोना’चा रिपोर्ट थेट रुग्णाला मिळणार नाही, मुंबई ‘मनपा’चा निर्णय

News Desk

हे तर ‘भ्रमित ठाकरे’ सरकार, चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

News Desk