HW News Marathi
महाराष्ट्र

“राज ठाकरे जाणार अयोध्येला, २३ तारखेला मिळणार सगळी उत्तर”- बाळा नांदगांवकर

मुंबई | गुरु मॉं कांचन गिरीजी व जगतगुरु सुर्याचार्यजी हे कृष्णकुंज येथे मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांची घेणार भेट घेतली आहे. त्याबद्दल, “आज ही भेट ठरवून घेतली. दोन्ही महाराज आले. हिंदूराष्ट्र हा अजेंडा होता” असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. “राज ठाकरेसारखा माणूस त्यांना हिंदुराष्ट्रासाठी योग्य वाटतो. मध्यंतरी राज ठाकरे आयोध्याला जाणार होते पण दुसरी लाट आली होती. आता ते लवकरच अयोध्येला जातील” असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर राज यांनी दिवाळीत अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. हिंदुराष्ट्र मजबूत करण्यासाठी राज यांचा निर्धार असून त्यांनी कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी दिलेले अयोध्याला येण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. सपत्नीक राज ठाकरे यांनी दोन्ही महंतांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जगतगुरू सूर्याचार्याजी यांनी राज यांना अयोध्येत येऊन हिंदुराष्ट्राच्या कार्यासाठी हातभार लावण्याची विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर राज यांनी दिवाळीत अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली. तत्पूर्वी कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यजी यांनी शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दर्शन घेतले. कांचनगिरीजी यांनी परप्रांतीयांच्या मुद्द्यांवरून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. राज ठाकरे यांनी ती भूमिका अज्ञानातून घेतल्याचे म्हटले होते. त्यामुळे आजच्या भेटीकडे सर्वांच्या नजरा होत्या. मागील दोन वर्षांपासून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे.

“अयोध्येच्या अखाड्यातून अनेक लोक बोलवत आहेत. आजोबा पणजोबांपासून हिंदुत्व राज ठाकरेंमध्ये भिनलेले आहे” असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. “राज ठाकरे कणखर हिंदुत्व मांडू शकतात राज ठाकरे यांनी आक्रमणपणे हिंदुत्व दाखवलं पाहिजे, अशी देशातून भावना आहे” असे नांदगावकर म्हणाले. “उत्तर भरतीयांबाबत कोणतेच समज-गैरसमज नव्हते ते मीडियाने केले. राज्य विकासाला न्याय मिळावा ही एक भावना होती. 23 तारखेला मनसेचा भांडुपला मेळावा आहे. त्यात सगळी उत्तर मिळतील” असे नांदगावकर म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जयंत पाटलांनी पावसात भाषण करण्यापेक्षा गावांचा पाण्याचा प्रश्न आधी मिटवावा”

News Desk

पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार नाहीत! सेनेनं भाजपला सुनावलं

News Desk

‘वर्षा’ बंगल्यावर बैठका सुरुच, मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ बैठकांतून काय उलगडणार?

News Desk