HW News Marathi
महाराष्ट्र

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हवामान खात्याचे केले कौतुक

अहमदनगर | महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज (५ जून) अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक घेऊन कोविड-19 वरील उपाय योजना, पीक कर्ज वाटप, खरीप हंगाम तयारी, कर्जमाफी, निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान याचा आढावा घेऊन प्रशासनाला योग्य त्या सुचना दिल्या. हवामान खात्याचा अचूक अंदाज व त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाने केलेले कौतुकास्पद कार्य यामुळे निसर्ग चक्रवादळपासून महाराष्ट्राची हानी टळली, असे मत यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

दरम्यान, कोरोनामुळे ढासळलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत सरकारचा महसूल बंद होता. परंतु सर्व शासकीय कार्यालये आणि महसूल देणाऱ्या यंत्रणा सुरू झाल्याने आता स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मंत्रिमंडळाची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींचा आढावा घेत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युजीसीच्या परीक्षांच्या निर्णयावरून वरुण सरदेसाई आणि आशिष शेलार आमने-सामने

News Desk

महाराष्ट्राचा कारभार सचिवांकडून नव्हे लोकप्रतिनिधींकडून चालला पाहिजे! : अतुल लोंढे

Manasi Devkar

ईडीकडे आमच्या नेत्यांचे पत्ते आहेत का? संजय राऊतांचा सवाल

News Desk