HW News Marathi
महाराष्ट्र

“स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, त्याचं काय झालं”, थोरातांचा फडणवीसांना सवाल

मुंबई। तुम्हाला जमत नसेल तर आमच्या हाती सत्ता द्या, चार महिन्यात आरक्षण देतो नाहीतर राजकीय सन्यास घेतो असं आव्हान देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला दिलं आहे. ५० टक्क्यावरीलही आरक्षण आम्ही वाचवलं होतं,पण ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं असंही चक्काजाम आंदोलनाच्या दिवशी (२६जून) ला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं.आता याच विधानावर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणतात स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही आणि त्यासोबतच मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू असं म्हणाले होते.

पुन्हा आता ओबीसी आरक्षण दिलं नाही तर संन्यास घेईन मात्र या सगळ्यांपैकी एकही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांच्या कडून झालेली नाही. असा टोला लावला राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावलाय, ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. “आमच्या हातात सूत्र द्या आम्ही ओबीसींचे आरक्षण चार महिन्यात पूर्ववत करू अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते यावर बाळासाहेब थोरात यांनी हा टोला लगावला.

सत्तेसाठी वाटेल ते बोलायचं प्रत्यक्षात कृती मात्र करायची नाही जनमानसाला फसवून आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते असे वक्तव्य करतात, असही थोरात बोलताना म्हणाले. तर स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आणि त्यानंतर काय झालं हे आपण सर्वांनी पाहिले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं गांभीर्याने घेण्याची गरज नाही अशी टीका देखील बाळासाहेब थोरात यांनी केलीये.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षानं (२६जून) ला राज्यभर चक्काजाम आंदोलन केल होत. आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये आंदोलन झालं. आंदोलकांना मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी यावेळी ओबीसी आरक्षणावरून मोठी घोषणा केली. ‘माझ्या हाती सत्तेची सूत्रे आली तर चार महिन्यांत ओबीसी आरक्षण देईन आणि देता आले नाही तर राजकीय संन्यास घेईन,’ असं फडणवीस म्हणाले. नागपूरमधील व्हरायटी चौकात भाजपच्या वतीनं जेलभरो आंदोलन करण्यात आलं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘स्वत:च्या अपयशाचं आणि नाकर्तेपणाचं खापर राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोडत आहे. स्वत:ला काही करता येत नाही आणि दुसऱ्याला दोष देतात. उद्या बायकोनं मारलं तरी हे मोदींवर आरोप करतील,’ असा टोला फडणवीस यांनी हाणला होता.

फडणवीसांची महाराष्ट्राला गरज – संजय राऊत

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे लढवय्ये नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य देखील उज्ज्वल आहे. त्यांना हि संन्यासाची भाषा शोभत नाही, ते फकीर होण्याची भाषा करत असतील तर मी स्वतः त्यांची भेट घेईल. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. “देवेंद्रजींना संन्यास घेऊ देणार नाही, त्यांची महाराष्ट्राला, आणि देशाला गरज आहे. त्यांची वीरभक्तीची भाषा हा महाराष्ट्रावर अन्याय होईल, चांगल्या नेतृत्वाचा महाराष्ट्राला तुटवडा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या हुरहुन्नरी नेत्याला फकीर होण्याची भाषा योग्य नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबरीचे ढाचे कोसळताच ज्यांनी बगला वर केल्या त्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच आहे! – सामना 

News Desk

शिवसेनेनंतर आता मनसेचा डोळा गुजराती मतांवर ….

News Desk

कारखान्याची काही चूक असेल तर नियमानुसार कारवाई होईल – जिल्हाधिकारी

Aprna