HW News Marathi
महाराष्ट्र

सोशल मिडियावरही बाप्पा मोरया!

मुंबई : राज्यभरात बाप्पाच्या आगमनाचा उत्साह संचारला असताना सोशल मिडिया, तरी त्यात मागे कसा राहील. सोशल मिडियावर बाप्पाच्या आगमनाची वर्दी आठ दिवसांपासून देण्यात येत आहे.

आज सकाळपासून, तर शुभेच्छा आणि बाप्पाच्या फोटोंचा पूर आला आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्अपच्या माध्यमातून बाप्पाचे फोटो, आरत्या, बाप्पाच्या दर्शनासाठी आग्रहाचे निमंत्रण दिले जात आहे. गणेशोत्सवासाठी गावाकडे निघालेल्या मुंबई पुणेकरांनी त्यांचे स्टेटस आणि फोटो अपलोड केले आहेत. घराच्या गणपतीची निमंत्रण देण्यासाठी, तर सोशल मिडियाचा मोठा आधार घेतला जात आहे. गणपतीची जुनी गाणी, आरत्यासुद्धा शेअर केल्या जात आहेत. कोकणात जाण्यासाठी ठिकठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी एसटीच्या बसेसची सुविधा भाविकांसाठी करून दिली आहे. त्या गाड्यांचे फोटोही उत्साहाने ट्विट करण्यात आले आहे. मुंबईच्या दादर मार्केटमधील फुलाफळांनी, सजावटीचे साहित्य, तोरणांनी अन् गर्दीने भरलेला माहोलही फोटोच्या रूपाने सोशल मीडियावर अवतरला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्विकारण्याला 30 जून पर्यंत मुदतवाढ!

News Desk

मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कंगनाच्या कार्यालयाची पाहणी

News Desk

भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन

Aprna
देश / विदेश

आधार’ सर्वोच्च न्यायालयाकडून ‘निराधार’

News Desk

नवी दिल्ली : लोकशाहीत व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे त्यावर घाला घालणाऱ्या कोणत्याही योजना किंवा उपक्रम शासनाला राबविता येणार नाहीत, असा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे. या निकालामुळे केंद्र शासनाची आधार ही महत्त्वाकांक्षी योजना निराधार होण्याची शक्यता आहे.

विविध योजनांचे लाभ मिळविण्यासाठी केंद्राकडून हळूहळू आधार सक्ती करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निकाल म्हणजे केंद्राला जोरदार धक्का असल्याचे मानले जात आहे. आधार सक्तीमुळे व्यक्तिगत गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचा भंग होतो, असा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर गेले आठ दिवस सुनावणी सुरू होती.

Related posts

जपानमध्ये ओव्हरटाइम केल्यानंतर पत्रकाराचा मृत्यू

News Desk

सौदीत दहा भारतीयांचा मृत्यू

News Desk

जर फ्रान्स-जर्मनी शांततेत जगू शकतात तर भारत-पाकिस्तान का नाही ?

News Desk