HW News Marathi
महाराष्ट्र

मुस्लिम बांधवांच्या आग्रहामुळे कॉग्रेस पुन्हा सत्तेत उतरली…

नांदेड | महाविकास आघाडीच्या सरकारवर अनेकांनीच ताशेरे ओढले. असेच काहीसे खळबळजनक वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येत आहोत असे सांगत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले मात्र आता सत्तेत येण्यामागे नेमकी काय करणे होती याचा उलगडा होऊ लागला आहे. मुस्लिमांच्या आग्रहामुळे आम्ही शिवसेनेसोबत हे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले नाहीतर भाजप पुन्हा पाच वर्षासाठी सत्तेत आलं असते , असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. या वक्तव्याने सरकारमध्ये खळबळ उडाली आहे.

भाजपाची महाराष्ट्रावरील हुकूमत थांबवण्यासाठी आणि भाजपाने गेली ५ वर्ष जे नुकसान केले ते पुन्हा न होण्यासाठी आम्ही सत्तेत उतरलो. इतकेच नव्हे तर आमच्या मुस्लिम बांधवांनी आम्हाला सांगितले की आमचा सगळ्यात मोठा शत्रु भाजपा आहे आणि जर त्याला सत्तेतून बाहेर काढायचे असेल तर कॉंग्रेसला सत्तेत उतरावेच लागेल. आणि म्हणूनच आम्ही शिवसेनेशी हातमिळवणी करत हे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले, असंही अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये सीएए विरोधात आयोजित केलेल्या सभेत स्पष्ट केले. दरम्यान भाजपने या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला. चव्हाणांच्या या विधानावर शिवसेना गप्प का आहे? असा खोचक सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. त्यामुळे हा वाद आता कोणतं वळण घेतो हे पाहणं महत्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अरे बापरे मला भीती वाटतेय…पण सामना वाचायला लागलात चांगली गोष्ट आहे!”

News Desk

कोविड सेंटरला लागलेल्या आगीत झालेले मृत्यू हे शिवसेनेच्या टक्केवारीचे बळी – अतुल भातखळकर 

News Desk

मुख्यमंत्र्यांकडून ११ नुकसानग्रस्तांना चेक वाटप

News Desk