HW News Marathi
महाराष्ट्र

‘कस्तुरबा’मधील बेडची क्षमता १०० पर्यंत करणार, ‘कोरोना’च्या तपासणी लॅबची संख्याही वाढवणार

मुंबई | राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३२ वर पोहचली असली, तरी घाबरून जाऊ नका, पण काळजी घ्या, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जनतेला माध्यमाद्वारे केले आहे. टोपे कस्तुरबा रुग्णालयता आज (१५ मार्च) पाहाणीसाठी गेले होते. त्यावेळी टोपेंनी माध्यमाशी बोलताना म्हणाले की, कस्तुरबा रुग्णालयातील रुग्णांना जेवण, टीव्ही आणि वायफास यासारख्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी टोपेंनी दिली.

दरम्यान, कस्तुरबा रुग्णलयात ८० कोरोना संशयित असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. येत्या ४-५ दिवसात शंभर बेडची सोय करणार असून डॉक्टर्सना लागणाऱ्या सर्व उपकरणे पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती टोपेंनी यावेळी दिली. येत्या १५ ते २० दिवसांत पुण्यात नव्या लॅबच्या सुविधा देणार आहेत. डॉक्टरांना लागणारी सर्व उपकरणे उपलब्ध आहेत. याशिवाय, मिरज, सोलापूर, धुळे आणि औरंगाबाद येथील शासकीय रूग्णालयात पुढील १५ दिवसात अशी यंत्रणा उभारण्याची कार्यवाही सुरू असल्याचे टोपेंनी सांगितले. तसेच राज्यातील एमपीएसी परीक्षा पुढे ढकलण्याच्या म्हणजेच या परीक्षा ३० तारखेनंतर घेण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत

कस्तुरबामधील बेड्ची क्षमता १०० पर्यंत केली जाणार आहे. याशिवाय, कस्तुरबा गांधी रूग्णालयासह मुंबईतील के.ई.एम. रूग्णालयातही कोरोना तपासणीची प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटल,मुंबई महापालिकेने ताब्यात घेतले असून ५०० बेड्स उपलब्ध आहेत.हॉस्पिटलमध्ये डागडुजीचे काम झाल्यावर ५०० बेड्स उपलब्ध करण्यात येतील.दाखल असलेल्या प्रवाशांबाबत विचारपूस करून डॉक्टरांशी चर्चा केली.येथे आवश्यकतेनुसार मास्क उपलब्ध करून देण्याचा सूचना देखील दिल्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बार्शीकर पळपुट्या राजकारण करणाऱ्यांना जागा दाखविणार !

News Desk

मराठीला ‘अभिजात’ दर्जाच्या मागणीसाठी ४ हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडे रवाना

Aprna

गावठी कट्ट्यातून गोळी सुटल्याने बालकाचा मृत्यू

News Desk