HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांनी ‘या’ करणासाठी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

मुंबई | राज्यातील कोरोनाची परिस्थीत दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. दरम्यान, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. गेले अनेक दिवस राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील वाद सगळ्यांच माहित आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून असो किंवा राज्यपाल नियुक्त आमदारांची रखडलेली यादी असो. हे सगळे मुद्दे बाजूला ठेवत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना गुढीपाव्यानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नूतन वर्षाभिनंदन. हे हिंदू नवे वर्ष आपणाकरिता तसेच कुटुंबातील सर्वांकरिता यश, समृद्धी, प्रगती आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी ईश्वरचणी प्रार्थना, असा मजकूर राज्यपालांच्या पत्रात आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील एक पाऊल पुढे टाकणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर झाली आहे. राज्यात कोरोना लस, रेमडिसिव्हीर इंजेक्शन आणि इतर आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. अशातच विरोधी पक्ष सरकारला फारसे सहकार्य करत असल्याचे दिसून येत नाही आहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारशी संवाद साधण्यासाठी राज्यपालांच्या मार्गे एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.

महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल”, असं मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाड न्यायदंडाधिकाऱ्यांकडून 4 अटींसह नारायण राणेंना जामीन मंजूर!

News Desk

हजारो कोटींचा घोटाळाकरून पळालेल्या नीरवमोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही

News Desk

तरुणाईने जिल्ह्यात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका घ्यावी! – पालकमंत्री उदय सामंत

Aprna