HW News Marathi
महाराष्ट्र

Bhandara Hospital Fire | आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ! प्रकाश आंबेडकरांची मागणी

मुंबई । संपूर्ण राज्याला सुन्न करणारी घटना शुक्रवारी (८ जानेवारी) मध्यरात्री भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता वार्डला अचानक आग लागली. या आगीत १७ नवजात बालकांपैकी तब्बल १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

प्रकाश आंबेडकर याविषयी म्हणतात की, “भंडाऱ्यामधील घडलेल्या घटनेत ‘वरातीमागून घोडं’ अशी गत झाली आहे. या दुर्दैवी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा.” पुढे प्रकाश आंबेडकर म्हणतात की, “या इमारतीचं बांधकाम झाल्यानंतर इमरतीचं ऑडिट होण आवश्यक होतं पण तसं झालं नाही. त्यामुळे या घटनेला आरोग्यमंत्री आणि PWD अधिकारी जबाबदार आहेत.”

दरम्यान, भंडाऱ्यातील याच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील आज (१० जानेवारी) या दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाच्या पाहणीसाठी जाणार आहेत. त्याचप्रमाणे, राज्य सरकारकडून यापूर्वी या मृत बालकांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री या दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पाहणी करणार आहेत. या दुर्दैवी घटनेने राज्य हादरून गेले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राजगृह’ तोडफोड प्रकरणी संशयित व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

News Desk

‘कोकणसाठी कटू निर्णय घेण्याची गरज’, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांची माहिती…

News Desk

मुख्यमंत्री आज जाणार अण्णांच्या भेटीला

News Desk